पुणे- : मराठे दौडले लाखो पुण्यात … (शिवतारे होते ) पण बापट,शिरोळे.. होते कुठे त्यात … ? असा प्रश्न करीत.. पुणे तिथे हाथ धुणे … हा प्रत्यय देखील आजच्या मराठा मोर्चात जनतेला आला … अशी प्रतिक्रिया आज संध्याकाळी उशिरा जनतेतून उमटत होती .ती राष्ट्रवादी आणि काँग्रेस सह अन्य राजकीय नेते ही या मोर्चात सामील झाल्याने … नेमके या मोर्चाने साधायचे काय ? फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून घालायचे कि , मुंबई शिवसेनेच्या ताब्यातून भाजपला काढून घ्यायची ? असे अनंत प्रश्न आम जनतेच्या मनात पिंगा धरत होते . मोर्चामुळे.. स्वस्ताई होईल ? अच्छे दिन प्रत्येकाला येतील ? या प्रश्नाबाबत सारेच नकारात्मक .. पण .. अशातही मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असं आमच्या सरकारचे स्पष्ट मत असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलेल्या वक्तव्याची बातमी धडकली आणि शिवाय मुख्यमंत्र्यांचे हेही वाक्य ध्यानात घेणाऱ्यांनी घेतले … ते म्हणजे … ”किती दिवस मुख्यमंत्री राहिन याची मला परवा नाही. पण जेवढे दिवस राहीन परिवर्तनासाठी काम करेन,” मुख्यमंत्र्यांचे हे वाक्य जनतेसाठी चर्चेचा विषय ठरले .
अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या जंतर मंतर नन्तर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होईपर्यंतचा काळ जनतेने पाहिला आहे . इव्हेंट , मिडिया सारे काही जाणून असलेल्या अर्थात फार थोड्या लोकांना याकडे लक्ष देण्याची गरज भासत नाही . पण मुंबईच्या मोर्चानंतरच या साऱ्याचे फलित काय ..ते लक्षात येईल असेही त्यांचे म्हणणे आहे. राहिला प्रश्न .. मास्टर माइंड चा तो आज नाही तर उद्या ..नाही तर परवा ..कधी तरी उघड होईलच असे हि काहींचे म्हणणे आहे .
दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबईत बोलताना म्हणाले ”सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत. स्वंतत्त्र भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचे मोर्चे निघाले आहेत. या मोर्चांचे स्वरुप मुक असले, तरी त्याचा आवाज मोठा आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे.यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीवरुनही वक्तव्य करुन अनेकांना धक्का दिला. यावेळी त्यांनी मराठा मोर्चाच्या आयोजकांना बिझत गोंधड ठेवू नका असे आवाहन करतानाच, राज्य सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यासाठी निर्णयाक निर्णय घेण्याची सरकारची तयारी आहे. या निर्णयासाठी आम्हाला चर्चा करायची आहे. कारण थेट निर्णय जाहीर करता येत नाही. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन चर्चा करावी लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कोपर्डी बलात्कारप्रकरणातील आरोपींना फाशी व्हायला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. यासाठी हे प्रकरण उज्वल निकम यांच्याकडे दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शासकीय महाविद्यालयात कॉलेजमध्ये कमी जागा आहेत. मात्र, दुसरीकडे धनदांडग्याच्या महविद्यालायात शिकणाऱ्या मराठा समाजातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य सरकार योजना तयार करणार, असल्याचंही त्यांनी यावेळी म्हणाले. तसेच मराठा समाजाच्या 5 लाख तरूणांना स्किल डेव्हलपमेन्ट केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी स्वत:चे बलिदान दिले.