विशाखापट्टनम(तेलांगाना)- कोस्टगार्ड जहाज जगुआरमध्ये आज(सोमवार) सकाळी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे जहाजावर एकच गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांना आग नियंत्रणात आणता आली नाही, त्यामुळे जीव वाचवण्यासाठी 29 कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या मारल्या. त्यानंतर भारतीय कोस्टगार्ड विभागाने 28 क्रू मेंबर्सना वाचवले, पण एक अद्याप बेपत्ता आहे. सध्या त्या बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
कोस्टगार्डनी सांगितले की, सकाळी 11.30 वाजता जहाजावर अचानक मोठा स्फोट झाला आणि सगळीकडे धुर पसरला. जीव वाचवण्यासाठी क्रु मेंबर्सना समुद्रात उड्या माराव्या लागल्या. कोस्टगार्डचे दुसरे जहाज “रानी राशमोनी” त्याच परिसरात फिरत होते. ते जहाज यांना वाचवण्यासाठी आले. 29 पैकी 28 क्रु मेंबर्सना वाचवण्यात यश आले, पण 1 बेपत्ता झाला आहे.