मुंबई-राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. कारण शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरीही पाठिंब्याचं पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलं नाही त्यामुळे राज्यपालांनी यासाठीची वेळ वाढवून दिली नाही. त्यामुळे दावा जरी कायम असला तरीही शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे. शिवसेना दिलेल्या वेळेपर्यंत बहुमत सिद्ध करु शकलेली नाही. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. राज्यपालांकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र तसं काहीही घडू शकलेलं नाही.आता राज्यपालांनी राष्ट्रवादी ला तिसरा पक्ष म्हणून आमंत्रण देवून सत्ता स्थापने साठी त्यांनाही २४ तासाची मुदत दिली आहे ..या ताज्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.प्रक्रियेनुसार राज्यपालांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. आम्ही आमच्या मित्रपक्षाशी बोलून लवकरात लवकर आमचा निर्णय कळवू, असं राज्यपालांना सांगितलं आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यपालांनी आम्हाला निर्णय कळवण्यासाठी उद्या रात्री साडेआठ वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान राज्यपालांकडे जाताना राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांनी मात्र आपल्याला राज्यपालांनी कशासाठी बोलाविले आहे ते ठाऊक नाही असे वक्तव्य केले होते .