आयुक्त साहेब इकडे लक्ष द्या हो …15 उत्तुंग,विशाल वृक्षांच्या जीवावर उठला , शेतकी विद्यापीठाचा कारभार…
पुणे-शेतकी महाविद्यालये ..निसर्गाची जोपासना करायला शिकविणारी ,शेती शिकविणारी ,झाडी जोपासणारी …महाविद्यालये ,विद्यापीठे ..राहुरी कृषी विद्यापीठ हि त्यातले असेल असे वाटणे साहजिक आहे पण … पण या विद्यापीठाचा कारभार ..चक्क विशाल आणि उत्तुंग अशा 15 झाडांच्या जीवावर उठला आहे .आणि हा प्रकार उघड्या डोळ्याने पाहत ..आपापल्या कामधंद्याकडे निमुटपणे पुणेकर जातील असे विद्यापीठाला वाटले असेल तर नवलच म्हणायचे .
कारण रवी नितनवरे आणि हरित परिवार ने या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे .आणि संताप व्यक्त केला आहे . मुळा रस्त्यावर बजाज गार्डन ते कोहिनूर इस्टेट दरम्यान हि बहुधा निलगिरीची विशालकाय झाडे आहेत . येथील आपल्या भूखंडाला सीमा भिंत घालायची म्हणून विद्यापीठाने झाडांचा जीव जाईल असा संतापजनक कारभार सुरु केला आहे .झाडांच्या लगतच त्यांनी सिमाभिंती साठी खोदाई चालू केली आहे . पावसाळा,कदाचित येणारे वादळ आणि एका बाजूने झाडांचा काढून घेतलेला भुई चा आधार यामुळे एक झाड काल उन्मळून पडले आहे . आणि बाकी 14 झाडे घटका मोजत बसले आहेत . आणि बहुसंख्य पुणेकर निमुटपणे पाहत आहेत .. पण येथील हरित परिवार या मित्र मंडळींच्या परिवाराने या विरुद्ध आवाज उठवायचा निर्धार केला आहे .तातडीने विद्यापीठाचा हा खुदाई कारभार थांबवावा , आणि केलेली खुदाई पुन्हा पूर्ववत करून झाडांना आधार द्यावा या साठी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.आता पडलेले झाड सुदैवाने रस्त्यावर पडले नाही …अन्यथा जीवित हानीझाली असती … आणि अशी जीवित हानी झाल्यावर नंतर मग जागे व्हायचे काय ? या मोठ मोठ्या विशाल झाडांचा असा बळी जाऊ द्यायचा काय ? असा सवाल त्यांनी केला आहे .आणि पुणे महापालिका आयुक्त सौरव राव यांनी तातडीने लक्ष घालून या बाबत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.