लवासा निर्णय अव्यवहार्य
नुकताच सरकारने लावासा प्रकल्पाचा विशेष दर्जा काढून घेतला व लावासाला PMRDA च्या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट केले हि गोष्ट अत्यंत चुकीची , अव्यवहार्य व आकसापोटी घेतलेली आहे असे माझे मत आहे व त्याची कारणे अशी :
१) सदर प्रकल्प समजा सर्व दृष्टीने बेकायदेशीर आहे असे घटकाभर समजून चाललो तर थोडक्यात तेथील बांधकामे अनधिकृत आहेत असा त्याचा अर्थ होतो व PMRDA सारखी अत्यंत अकार्यक्षम संस्था याचा बोजा उचलणार आहे व ती गोष्ट आश्चर्य कारक वाटते कारण PMRDA ला सध्याच असलेल्या कामाला गती देता आली नाही. बांधकाम परवानग्या सुलभ करता आल्या नाहीत. कार्यक्षेत्रातील हजारो अनधिकृत कामांवर कार्यवाही करता आलेली नाही तर ती संस्था हे जादा काम सांभाळू शकत नाही असा माझा दावा आहे.
२)सध्याच्या सरकारने मुंबई,ठाणे,कल्याण,डोंबिवली,पिंपरी चिंचवड,पुणे येथील अनधिकृत कामांना अधिकृत करून घेतले आहे व काही घेण्याच्या मार्गावर आहेत त्यामागे सरकारचा राजकीय हेतू असेलही मग लावासा मधील हजारो गुंतवणूकदारांना वेठीस धरून हिंदुस्तान कंपनीला शिक्षा करावयाची व कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमीनदोस्त करावयाची हा विचार अप्रगतपनाचे लक्षण आहे.
सगळ्याच गोष्टी सरकार दरबारी कायदेशीर चाललेल्या असत्या तर मग हे ठीक आहे पण अनेक ठिकाणी बेकायदेशीर रेटून थेटन गोष्टी करावयाच्या व सर्वांना समान न्याय द्यायचा नाही हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही.
भास्करराव म्हस्के
BE Civil (MIE)
माजी शहर अभियंता (नगर शहर)
9890351034