स्मार्ट सिटीत पादचाऱ्यांसाठी उत्तम पदपथ असणे गरजेचे – एस आर कुलकर्णी
पुणे-आपण परदेशात बघतो की पादचाऱ्यांसाठी उत्तम पदपथाची निर्मिती केली जाते आणि हे पदपथ अतिक्रमण मुक्त असतात.युरोप मधे तर सायकल ट्रॅक आणि पादचाऱ्यांसाठी उत्तम पदपथ असणे हे स्मार्ट सिटी साठी आवश्यक समजले जाते असे मत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष एस आर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.अनेक भागात विविध विकास कामांसाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करावा लागतो पण प्रभाग १३ मधे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर याच नागरिकांकडे पाठपुरावा करतात आणि विकासाची कोणती कामे करावीत यासाठी चौकसपणे प्रभागात कार्यरत असतात,याचे अनुकरण सर्वांनीच केल्यास शहरातील विकासकामे अधिक लोकाभिमुख होतील असेही ते म्हणाले. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकासनिधीतून प्रभाग १३ मधील ” के 52 ते पोतनीस परिसर ” येथील नवीन पदपथ करणे या कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
मी प्रभागातील सर्व विकासकामे ही नागरिकांच्या मागणीनुसारच करत असून विकासनिधीचा विनियोग ही नागरिकांना विश्वासात घेउनच करत आहे असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.अनेक वेळेला काही अप्रिय निर्णय ही घ्यावे लागतात पण नागरिकांना त्यामागील कारण सांगितले किंवा टेंडर प्रक्रियेमुळे होणाऱ्या विलंबाबाबतची माहिती दिल्यास नागरिक ते समजून घेतात व सर्वतोपरी सहकार्य करतात हा माझा अनुभव आहे.आपल्या भागातील पदपथ फेरीवाले पथारीवाले मुक्त असावेत याकडे माझे बारकाईने लक्ष असून सिटीप्राइड रस्ता,समर्थ पथ,ताथवडे उद्यान पथ,पटवर्धनबाग रस्ता,करिष्मा सोसायटी पथ,नळस्टॉप ते डहाणूकर चौकापर्यंतचा कर्वे रस्ता हा बऱ्यापैकी अतिक्रमण मुक्त आहे,काही फुटकळ विक्रेते अधूनमधून अतिक्रमण करतात मात्र त्यावर ही कारवाईसाठी मी आग्रही असतेच,असेही त्या म्हणाल्या.
यावेळी नगरसेवक दीपक पोटे,जयंत भावे,माधुरीताई सहस्त्रबुद्धे,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,प्रशांत हरसुले,शंतनू खिलारे,रमेश चव्हाण,सुलभाताई जगताप,माणिकताई दीक्षित,इ पदाधिकारी उपस्थित होते.
के 52 या सोसायटीचे पदाधिकारी यशोदीप जोशी,माधुरी कुलकर्णी,नुपुरा गाडगीळ,विराज शिंदे,शेखर वाईकर,विक्रम कुंभार….
पोतनीस परिसर चे संजय कबाडे,रामचंद्र चौसाळकर,श्री मोहन गर्गे,श्रीमती मिस्त्री,गिरीश कर्णिक….गिरीजाशंकर विहार चे अनंतराव शेलार,सोपानराव वावरे इ उपस्थित होते.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले,संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमानंतर नागरिकांशी मुक्त संवाद साधण्यात आला व त्यांच्या समस्या समजून घेउन त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.