यावेळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, विश्वस्त योगेश देसाई, युवराज ढमाले कॉर्पचे वैष्णवी ढमाले, युवराज ढमाले, यांच्यासह धावडे, जगताप, तरवडे, परमार, सपकाळ, मोडवे कुटुंबीय आणि विविध दिंड्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवराज ढमाले म्हणाले, “गेली बारा वर्षे माऊलींच्या पालखी सोहळ्यात शक्य तेवढी सेवा करतो. वारकर्यांच्या गरजांना अनुसरून उपक्रम हाती घेऊन काम करत आहोत. अनेक वर्षे टिकतील आणि त्यांना उपयोगी पडतील, अशा वस्तू देण्यावर आम्ही भर देतो.”
राजाभाऊ चोपदार म्हणाले, “वारीला पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी युवराज ढमाले यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. शासन आणि सामाजिक स्तरावर पालखी सोहळा अधिक सुरळित होण्यासाठी प्रयत्न केले जातात. विविध पालखी तळावर विकासात्मक कामे व्हावीत, तसेच पायाभूत सुविधा उभाराव्यात.” रामभाऊ चोपदार यांनी वारकर्यांच्या वतीने युवराज ढमाले कॉर्पच्या पुढाकाराचे कौतुक केले. सचिन पवार यांनी सूत्रसंचालन केले.
‘रयत प्रबोधिनी’च्या दहा विद्यार्थ्यांचा खर्च करणार
पालखी सोहळ्यात स्वयंसेवक म्हणून काम करत असलेल्या रयत प्रबोधिनी संस्थेतील विद्यार्थ्यांशी युवराज ढमाले यांनी संवाद साधला. यातील राज्यसेवा आणि पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येकी पाच अशा दहा गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचा वर्षभराचा भोजन आणि शैक्षणिक खर्च करणार असल्याचे ढमाले यांनी सांगितले.