त्यांचा रक्तदाब अचानक कमी झाला होता. पर्रीकरांना झोपुन राहण्यास सांगण्यात आलो होते. मागील पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. पण शनिवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्यावर राहत्या घरीच उपचार सुरू झाले. गेल्या, कित्येक दिवसांपासून पर्रीकरांची सुरू असलेली मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली. पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोककळा पसरली आहे.
शांत व निगर्वी व्यक्तीमत्व हरपले – गिरीश बापट
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहरजी पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अतीव दुःख झाले. संरक्षण मंत्री असताना त्यांनी देशहिताचे अनेक चांगले निर्णय घेतले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गोव्याचा विकास तर केलाच पण पुण्याच्या विकासात ही त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याच्या विमानतळाचा विस्तारीकरणाचा निर्णय असो वा पुण्यातील विविध विकास कामांसबंधी लागणाऱ्या लष्कराच्या परवानग्या देण्याचा निर्णय असो, अगदी विनाविलंब त्यांनी निर्णय घेतले. त्यांची जशी साधी राहणी होती तसेच त्यांचे विचार उच्च होते. पर्रिकर हा भाजपाचा अभ्यासू चेहरा होता. गंभीर आजारी असतानाही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाच्या आणि गोव्यातील जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतले. अशा या झुंजार व्यक्तीमत्वास माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
मनोहर पर्रिकरांचा प्रवास
13 डिसेंबर 1955 रोजी मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील मापुसा येथे जन्म झाला. मार्गोओ येथील लोयोला हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे माध्यमिक शिक्षण मराठी भाषेतूनच झाले. पुढे 1978 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
आयआयटी शिक्षित मनोहर पर्रिकर हे भारतातील पहिले आमदार होते.
मनोहर पर्रिकर यांनी सुरूवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले. तरूण वयातच ते संघात मुख्य शिक्षक बनले. पुढे राजकारमात त्यांनी भाजपमधून प्रवेश घेतला.
1994 साली पहिल्यांदा पर्रिकर गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडूण गेले. जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2000 रोजी मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठा कालावधी गोव्यात घालवला.
2014 साली केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर मनोहर पर्रिकर हे देशाचे संरक्षणमंत्री झाले. त्यासाठी उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवर गेले. मात्र, गोव्यात राजकीय त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्याने, पर्रिकर पुन्हा गोव्यात परतले आणि मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. पण, याच काळात त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले, आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.