पुणे, दि. 6 : स्मारक उभारण्याएवढेच ते जोपासणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज येथे केले. सिंहगड रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या वीरबाजी पासलकर स्मारकाचे अनावरण व उद्यानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, नगरसेवीका मंजुषा नागपुळे, पांडुरंग जगताप, जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, पासलकर कुंटुबीय व नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, राज्यातील थोर पुरुष व शुर विरांचे कार्य आणि त्यांचा इतिहास तरुण पीढीपर्यंत पोहचणे अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी श्री.बापट यांनी उद्यान व स्मारकाची पाहणी केली.