पुणे-आपल्या पाल्याला क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर करण्यासाठी पालक सतत त्याग करतात, आपल्यामुलांमुलींना प्रोत्साहन देतात. त्यामुळेच खेळाडूंच्या यशात पालकांचे योगदानास अनन्यसाधारण महत्व आहे असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
क्रीडा भारती संस्थेतर्फे पुण्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा बापट यांच्या हस्ते जिजामाता पुरस्कार देऊन सन्मान
करण्यात आला. या वेळी क्रीडा भारतीचे अखिल भारतीयम हामंत्री राज चौधरी, पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य विजय पुरंदरे,
अखिल भारतीय कोषाध्यक्ष मिलिंद डांगे, जनता सहकारी बँकेचेअध्यक्ष संजय लेले, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष सुभाष मोहिते हेया वेळी उपस्थित होते. या समारंभात शिरीन लिमये, संपदाबुचडे, अभिजित व मृणालिनी कुंटे, नुपुर हगवणे, तारा शहा,
देविका वैद्या, ऋतुजा सातपुते, पूजा शेलार, रोहिणी मोहिते,अंकिता गुंड या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव करण्यात
आला.
बापट यांनी पुढे सांगितले, खेळाडूंच्यामातापितांचा गौरव करणे हा अतिशय स्वागतार्ह उपक्रम आहे.समर्थ नागरिक होण्यासाठी क्रीडांगणावरील संस्कारांना अतिशयमहत्त्व आहे. समाज घडविण्यात खेळाडूंचा मोठा वाटा असतो. हे
लक्षात घेऊनच क्रीडागणांसाठी राखीव असलेले भूखंडांचे आरक्षणखेळासाठीच राहील असेच आम्ही शासनाकडून धोरण राबवितअसतो. अधिकाधिक मैदाने उपलब्ध झाली की आपोआपचखेळाडूंची संख्या वाढली जाईल.
चौधरी म्हणाले, आपल्या देशात आरोग्यादायी जीवनाबाबतखूप अनास्था वाढत चालली आहे. जागतिक स्तरावरील तंदुरुस्त
व सशक्त नागरिकांच्या मापदंडात आपला देश खूप पिछाडीवरचालला आहे ही अत्यंत शोकांतिका आहे. स्वास्थ्य सुधारण्यासाठीप्रत्येक नागरिकाने मैदानांवर दररोज काही ना काही तरी खेळखेळण्याची गरज आहे. खेळाकडे स्पर्धेचे साधन म्हणून न पाहताआनंद मिळविण्यासाठी मनोरंजनाचे उत्तम माध्यम पाहिलेपाहिजे. क्रीडा भारतीतर्फे सर्वसामान्यांमध्ये क्रीडा क्षेत्राविषयीजाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सांघिकखेळांवरही आम्ही भर देत असतो.
सत्कारार्थींच्या वतीने अभिजीत कुंटे व मौसमी वैद्य यांनी आपलेविचार मांडले. प्रा. शैलेश आपटे यांनी प्रास्ताविक केले. जयसिंगजगताप यांनी आभार मानले.