देवदूत नावाचा बकासुर…प्राथमिक दृष्टया महापौरांचे पत्र आदेश चूकीचेच
३ दिवसात आयुक्तांच्या तावडीत सापडणार काय ‘देवदूत चा बकासुर ‘ ?(व्हिडीओ)
‘देवदूत’ खरेदीसाठी तरतूद करा म्हटले,खरेदी करा म्हटले नाही ..महापौरांचा पवित्रा;
आयुक्त म्हणाले ३ दिवसात चौकशी पूर्ण होईल -अहवाल सर्वांपुढे सादर करू
पुणे- ‘सकाळ’ने चव्हाट्यावर आणूनही देवदूत नावाच्या ‘बकासुर घोटाळ्यावर अद्याप कारवाई तर काही झालेली नाही मात्र चौकशी करून ३ दिवसात आपण अहवाल ठेवू असा दावा आयुक्त सौरव राव यांनी आज केला . तर महापौर मुकता टिळक यांनी ,सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पत्राच्या छायाचित्रा विषयी आणि एकंदरीत वृत्ता विषयी अजब पवित्रा घेत , हि दिशाभूल असल्याचे म्हटले आहे .यामुळे खरोखर ३ दिवसात ‘देवदूत ‘ नावाचा बकासुर आयुक्तांच्या तावडीत सापडणार काय ?असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
(‘८१ लाखांच्या वाहनांची ११ कोटी ४१ लाखांना खरेदी ‘अशा व अन्य शीर्षकाखालील ‘सकाळ ‘ मधील बातम्यांनी ‘देवदूत’ योजनेचा पर्दाफाश चालविला आहे. )
‘देवदूत’ च्या खरेदी साठी आर्थिक तरतूद करा असे पत्र आपण कुणालकुमार या तत्कालीन आयुक्तांना दिले होते पण याचा अर्थ असा होत नाही कि नव्या गाड्या घ्या असे आपण म्हटले किंवा जास्त दराने खरेदी करा असे म्हटले .जर देवदूत या प्रकरणात घोटाळा झालाच असेल तर चौकशी करा अशी मागणी आपणही करीत आहोत असे महापौरांनी म्हटले आहे .
तर याचवेळी या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या आयुक्त सौरव राव यांनी , महापौरांना किंवा अन्य कोणत्याही सभासदाला पत्र देण्याचा अधिकार आहे,मात्र त्याबाबत सर्व निकष तपासून काम करण्याची जबाबदारी प्रशासनावर असते हे स्पष्ट केले .आणि याबाबत स्थायी समितीत चौकशीचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिल्याचे जाहीर केलेले आहेतच .आणखी ३ दिवसात चौकशी पूर्ण होईल आणि अहवाल आपण खुला करू असे सौरव राव यांनी म्हटले आहे.
पण त्याच बरोबर देवदूत च्या टेंडर प्रक्रियेत कोणताही घोटाळा नसून ती सुमारे साडेतीन वर्षापूर्वी झाली आहे .आता देवदूत हि यंत्रणा अनावश्यक रित्या खर्चिक आणि विना उपयोगी आहे काय ?याबाबत चौकशी केली जाईल असे ते म्हणाले .या शिवाय पुण्या सह अन्य महापालिकांनी देखील देवदूत ची यंत्रणा खरेदी केल्याचे , आणि त्याचे दर राज्य सरकारनेच ठरविल्याचे त्यांनी म्हटले आहे .त्या मुळे देवदूत चा बकासुर नेमका आता राज्य सरकारच्या दिशेने वळणार काय ? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
महापौर यांनी डिसेम्बर 2017 ला आयुक्तांना दिलेले पत्र, त्यातील मजकूर पहाता, आणि सध्या ‘सकाळ ‘ ने देवदूत यंत्रणेचा भ्रष्टाचारी बकासुराची मांडलेली माहिती पहाता, त्यावर महापौर यांनी आज दिलेले स्पष्टीकरण विचारात घेता, महापौरांचे पत्र म्हणजे, भ्रष्टाचार किंवा ग़ैरव्यवहार यांना सहाय्य होईल असेच असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढताना अनेक जण दिसत आहेत, महापौर यांनी गैर समजाने चुकिने, अविचाराने आयुक्तांना पत्र दिले असेल असे मानले तर महापौर यात अजाणते पणे गोवले जात आहेत की राजकीय दृष्टया गोवले जात आहेत हे ही पहाने महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान काँग्रेस, शिवसेना, एम आय एम, मनसे, आर पी आय या पक्षांनी आजवर याप्रकरणी कोणतीही वाच्यता करने टाळले असल्याचे चित्र आहे