पुणे : दहीहंडी हा सण हंडी फोडण्याचा नसून तो आपली संस्कृती आणि परंपरा जपणारा आहे. भारतीय परंपरेतील सण-उत्सव हे एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बांधले गेले आहे. खरतर आपण या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचंच काम करत आहोत.
गेल्या नऊ वर्षापासून संस्कृती व भारतीय परंपरेला अनुसरून निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रणीय असलेले साम्राज्य प्रतिष्ठान व सामर्थ्य वाद्य पथकच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्याचा मान या वर्षी माई बालभवन मधील अंध मुलींना देण्यात आला. खेळ, विविध कला, शिक्षण, स्वयंपाक अशा अनेक कामात निपुण असलेल्या या मुलींनी पहिल्यांदाच दहीहंडी फोडण्याचा अप्रतिम उपक्रम सांगवी मधुबन सोसायटी मधे साम्राज्य प्रतिष्ठान द्वारे करण्यात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी सांगवी पूरग्रस्त विद्यार्थांना शालेय वस्तूंचे तर महिलाना संसार उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. दहीहंडी च्या या उत्सवाला प्रमुख उपस्थितीत वीरपत्नी श्रीमती दीपाली विजय मोरे त्याच बरोबर पथकातील कार्यकर्ते उपस्थित होते.
या वर्षी दहीहंडी उत्सव साजरा करतांना प्रतिष्ठानच्या वतीने सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील गावांना मदतीचा हात देण्यासाठी परीसरातील समाज बांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व परीसरातील अनेक जण येणाऱ्या 31 ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागातील गावात जाऊन महाश्रमदान व तेथिल नागरिकांचे आरोग्य तपासणी करणार असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्यकरणी मंडळाने सांगितले