स्मशानभूमीतील कामगारांचा सन्मान
पुणे – महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कुसुमवात्सल्य फाउंडेशन तर्फे स्मशानभूमीतील कामगारांचा जाहीर सन्मान व कुसुमवात्सल्य फाउंडेशन या संस्थेचे उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. स्मशानभूमीतील काम करणाऱ्या दुर्लक्षित राहिलेल्या कामगाराला जगण्याचा सन्मान मिळावा, कामगारांच्या हिताचे रक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे, परंतु आज कामगार वर्ग सेवा सुविधांपासून वंचित राहिला, अशा कामगारांच्या पाठीशी कुसुमवात्सल्य फौंडेशन नेहमीच उभी राहील असे मत संस्थेच्या संस्थापिका वैशाली पाटील यांनी व्यक्त केले.
कुसुमवात्सल्य फाउंडेशनच्या वतीने कात्रज तलाव येथील स्मशान भूमीतील ‘कामगारांचा सन्मान’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्मशान भूमीतील 42 महिला, पुरुष कामगार व एका हिंदू मुस्लिम जोडप्याचा भेटवस्तू, मिठाई आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सर्व कामगारांच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. यावेळी महाराष्ट्र राज्य करागृह पोलीस महासंचालक डॉ विठ्ठलराव जाधव, शांतिदूत फाऊंडेशनच्या अध्यक्षा विद्याताई जाधव, नगरसेविका मनीषा कदम, नगरसेविका अमृता बाबर, शिरीष मोहिते, किरण गहिवरकर, राजाभाऊ कदम, उद्योजिका प्रीती काळे, ज्योती देशकर, दीपा परब, महेश धाडवे पाटील, मनोज मांगडे, यशवंत पाटील, योगिता पाटील, पूजा पाटील, जयप्रकाश पाटील, राधिका नगरे, वर्षा गवते, महेंद्र पाटील, तानाजी दुधाने, डॉक्टर बावसकर, राजाभाऊ पानगावे, सागर घाम, भूषण पाटील, यशवंत माझिरे, अशोक रायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैशाली पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन किरण गहिवरकर यांनी केले.