पुणे-‘राजस्थानचे वनमंत्री सुखराम विष्णोई , जालोर-सुरूही लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार
रतन देवासी तसेच जालोर जिल्हा काँग्रेसचे अध्य्क्ष सबरजित सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत
बिबवेवाडी येथील नाजूश्री सभागृहात बुधवारी पार पडलेल्या राजस्थान समाजाच्या बैठकीत पुणे
लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आणि आघाडीचे उमेदवार मोहन
जोशी यांना पाठिंबा दर्शविण्यात आला. या बैठकीला सुमारे तीन हजाराहून अधिक नागरिक
उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी पुण्यात राजस्थानी समाज मोठ्या
प्रमाणावर असल्याने पुणे- जोधपूर ही दररोज नवीन रेल्वे तसेच पुणे-जोधपूर विमानसेवा सुरु
करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला राजस्थान समाजाचे ३६-कौमचे सर्व
अध्यक्ष व पदाधिकारी तसेच अशोक जैन, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, काका
धर्मावत, जगदीश उणेचा या सह तीन हजारहून अधिक समाज बांधक उपस्थित होते.