पुणे : जनतेला दिलेले एकही आश्वासन भाजपने पूर्ण न केले नाही. त्यामुळे लोकांचा आता भाजपावर विश्वास राहिला नाही. मतदारांचा भ्रमनिराश झाला असल्यानेभाजपाविरोधात मतदान करण्याची त्यांची मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. असे असले, तरी इव्हीएम मशिन आणि संबंधित यंत्रणेबाबतपदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना सर्तक रहावे लागणार आहे. असा सुचक इशारा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांना दिला.
पाटील यांनी पुण्यातील आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचेसरचिटणीस अभय छाजेड, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके, शहर काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख रमेश अय्यर उपस्थितहोते.
पाटील म्हणाले, राज्यात दुष्काळ आहे. लोकांना टँकर मिळत नाही. जनावरांना चारा नाही. सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध डेअरी, जिल्हा बँका, शेतकरी, कष्टकरी, तरूण अडचणीत आहेत. राज्यावरील कर्जात दुप्पटीने वाढ झाली आहे. ग्रामसेवकांप्रमाणे आयपीएस आएएसच्या दर महिन्याला बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातभाजपाविषयी असंतोष पसरला आहे.
त्यामुळे राज्यात युतीपेक्षा महाआघाडीला जास्तीच्या जागा मिळणार असल्याचा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
मागील पाच वर्षांत कधी नव्हे इतका सामाजिक तणाव होता. सद्य:स्थितीतही राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यामुळे आश्वासने आणि फसविगिरीला लोकविसरणार नाहीत. आमच्या धनदांडगे लोक नाहीत, जाहीरातीत तसेच फ्लेक्सबाजी करण्यात आम्ही मागे असू, मात्र आमच्या पाठिंशी सामान्य मतदार उभे आहेत. राज्यातासहदेशात कोणत्याच प्रकारची लाट नाही. सरकारवर लोकांचा विश्वास राहिला नसल्याने त्यांच्या मागे मतेही नाहीत. त्यामुळे फक्त काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी इव्हीएममशिनबाबत सर्तकता बाळगल्यास निश्चितच विजय आपला असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बारामतीत सुळेंना पूर्ण पाठिंबा
लोकशाहीत प्रश्न मांडण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. त्यामुळे आमचेही काही प्रश्न होते. ते मांडले, त्याची उत्तरेही आम्हाला मिळाली. त्यामुळे कालच बारामतीतीलआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी इंदापूरात मेळावा घेतला. भोरलाही मेळावा झाला. बारामती मतदार संघातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्तेखंबीरपणे सुळे यांच्या पाठिशी उभे आहेत. त्यामुळे
त्यांचा चांगल्या मतांच्या फरकाने विजय होईल, यात शंका नाही. तसेच विजयसिंह मोहिते पाटील एका खासगी कामानिमित्तआले होते. ते थेट माझ्या घरी चहाला आले. ती राजकीय भेट नव्हती. चहा घेऊन ते त्यांच्या कामाला निघून गेले. असा खुलासाही पाटील यांनी यावेळी केला.