पुणे – ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील मंदिरात शारदा – गजाननाची आरती करून आशिर्वाद घेऊन पुणे शहर
लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – पिपल्स रिपब्लीकन आघाडी, शेकाप आणि मित्र पक्षांच्या
महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज मंडई परिसर, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठेतील नागरीकांशी संवाद
यात्रेव्दारे संवाद साधला. या संवाद यात्रेच्या मार्गावर अनेक गणेश मंडळ आहेत. प्रत्येक ठिकाणी थांबून मोहन जोशी
कार्यकर्त्यांची नावे घेत चौकशी करत कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क अधिक भक्कम करतानाच यावेळी देश, महाराष्ट्र आणि
पुण्याला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत होते. रणरणत्या उन्हात
फिरत संवाद साधणा-या या सर्वच कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी थंडगार पाणी देण्याचे काम मतदारांनी केलेले बघायला
मिळाले.
या संवादयात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकूश काकडे, अखिल मंडई
मंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आण्णा थोरात, डॉ. सतीश देसाई, युवक काँग्रसचे अखिल
भारतीय समन्वयक रोहित टिळक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक बुवा नलावडे,
महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, सदानंद शेट्टी, रवींद्र धंगेकर अजित दरेकर आदी नगरसेवक, संजय
बालगुडे, बाळासाहेब दाभेकर, विरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, शिरीष मावळे, प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा
कमल व्यवहारे, नीता रजपूत, काँग्रेसचे कसबा ब्लॉकचे अध्यक्ष प्रवीण करपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कसबा ब्लॉकचे अध्यक्ष
विनायक हणमगर, कार्याध्यक्ष गणेश नलावडे, अनिल सोंडकर, बाळासाहेब मारणे, जयसिंग भोसले, संजय पासलकर,
अशोक जाधव, राजेंद्र देशमुख, सतीश मोहळ, सुनील खाटपे, संजय मते, दीपक जगताप, विजय खराडे, रजनी पाचंगे,
मनसेच्या महिल अध्यक्ष ऍड रूपाली पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पक्षांचे पदाधिकारी या संवाद
यात्रेत सहभागी झाले होते.
शारदा गजाननाचे दर्शन घेतल्यावर मंडईतील कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पराह अर्पण करून मोहन
जोशी यांनी मंडईतील व्यापारी, भाजीविक्रेते आणि भाजी खरेदीसाठी आलेले ग्राहक यांच्याशी संवाद साधून आपल्या
यात्रेचा प्रारंभ केला. शिदे आळीत प्रथम मंडळातर्फे नाना मारणे यांनी त्यांचे स्वागत केले. पुढे अकरा मारूत, सेवा मित्र
मंडळ, चिंचेची तालीम मंडळ, जोशी समाज मंडळ, सुभाषनगर, बाजीराव रोड, महाराणा प्रताप उद्यान, खजिना विहीर,
नागनाथ पार, शनिपार मंडळ, अप्पाबळवंत चौक, केसरीवाडा, मोदी गणपती, विजय टॉकीज चौक, खालकर तालीम,
अखिल टिळक रोड मंडळापासून अशोक विद्यालय येथे संवाद यात्रेची सांगता झाली.
आजच्या संवाद यात्रेत कोणतेही वाद्य नव्हते, चौकाचौकात फटाक्यांच्या माळा लावून यात्रेचे स्वागत
करण्यात येत होते. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या फडकणा-या झेंड्यांमुळे यावेळी वातावरण मोहन जोशीमयझाले होते. उत्साही कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे पदयात्रेत उत्साह भरला जात होता. जशजशी संवादयात्रा पुढे सरकत
होती तसा उन्हाचा चटका वाढत असला तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. अनेक चौकात मतदारांनी
स्वत:हून पुढे येऊन मोहन जोशी यांच्याशी संवाद साधल्याचे चित्र कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे होते.
पर्वती विधानसभा मतदार संघात पदयात्रा
मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी पर्वती विधानसभा मतदारसंघात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस- आणि मित्र पक्षांचे झेंडे घेऊननिघालेल्या कार्यकर्त्यांनी ‘पुण्याची ख़ुशी – मोहन जोशी ‘ एकच वादा मोहन दादा ‘ ‘मोहन दादा आगेबढो हम तुम्हारे साथ है ‘या दिलेल्या विविध घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता .
अप्पर चौकातील तृप्ती हॉटेल पासून सुरु झालेली ही प्रचार फेरी व्ही आय टी कॉलेज – प्रियदर्शनी शाळा – गणेश नगर – अप्पर डेपो – पवन नगर – पद्मावती नगर – सरगम नगर -तुळजाभवानी नगर -अंबिका नगर -या मार्गाने जाऊन कामगार-नाका येथे या प्रचारफेरीचा समारोप करण्यात आला.
या प्रचार फेरीत नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस
अभय छाजेड ,शशिकला कुंभार, नितीन कदम ,सोनाली मारणे,सतीश पवार, जयकुमार ठोंबरे, गोरख मरळ , सतीश गिले, नीता नेटके , ताई कसबे, रजिया बिल्लारे, टी. एस. पवार, धनंजयकांबळे , दीपक ओव्हाळ , मामा परदेशी, संतोष पाटोळे ,सुमन इंगवले , यांच्या सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते .
कामगार नाका येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना नगरसेवक आबा बागुल म्हणाले की , कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच पुण्याचा विकास करण्यासाठी काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत मोहन जोशी यांच्या सारख्या कार्यकर्त्यास उमेदवारी दिली आहे . काँग्रेस सत्तेवर आल्यावर काँग्रेसने घोषित केलेल्या आपल्या जाहीरनाम्यानुसार गरिबांच्या खात्यात वर्षाला ७२००० रुपये निश्चितच जमा होणार आहेत, मोदी सरकारच्या १५ लाखाच्या घोषणे सारखा तो भूलभुलैया नाही असेही त्यांनी
सांगितले .
या प्रसंगी अभय छाजेड म्हणाले , केंद्रातील मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिली , अर्थव्यवस्था डबघाईला आणली , आज महागाईने सगळी जनता त्रस्त आहे अशावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीने मोहन जोशींसारखा उमदा उमेदवार दिला आहे त्यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.