पुणे- ही निवडणूक म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठीची अंतिम लढाई आहे. अच्छे दिन येणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार अशा अनेक भूलथापा देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वानवडी येथे झालेल्या ओ. बी .सी. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
वानवडी परिसरातील काँग्रेस पक्षाचे तरुण नेते व ओ. बी .सी संघटक साहिल केदारी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगीअ.भा.अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्ष व माजीमंत्री नितीन राऊत , शहर काँग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे , आमदार
अनंतराव गाडगीळ , प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड , पुणे लोकसभा मतदार संघातीलकाँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, नगरसेवक अविनाश बागवे,शिवाजीराव केदारी, शांताराम कुंजीर, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष मोरे, गौतम वानखेडे, स्त्रीमुक्ती चळवळीच्या नेत्या सुषमा अंधारे आदी उपस्थित होते.
या सरकारने नोटाबंदी आणि जी एस टी च्या माध्यमातून सामान्य जनतेवर सर्जिकल स्ट्राईककेला. असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ ३१%मते पडली होती आणि विरोधकांना ६२% मते मिळालेली मात्र विरोधकांची मते विखुरली गेल्याने
भाजपला सत्ता मिळाली आता या निवडणुकीत भाजपच्या विरोधात विरोधकांची महाआघाडी झालीअसल्याने या आघाडीचा विजय निश्चित आहे.
मोदी सरकारने तसेच फडणवीस सरकारने अनुसूचित जातींच्या अनेक योजनांना कात्री लावलीअसा आरोप करून नितीन राऊत म्हणाले, गेल्या ४ वर्षात अनुसूचित जाती तसेच इतरमागासवर्गीय जनतेमध्ये असुरक्षिततेचे भय निर्माण झाले आहे. मोदी सरकारच्या जातीयवादी
कारभाराला जनता आता कंटाळली असून या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे असेही त्यांनी सांगितले.
मोदी यांच्या राजवटीत जातीयवादी शक्ती फोफावल्या असे सांगून रमेश बागवे म्हणाले,राज्यातील दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर या पैकी कोणीही सुरक्षित नाही. अनेक मंत्र्यांचीभ्रष्टाचाराची प्रकरणे विरोधकांनी उघडकीस आणली असताना मुख्यमंत्री मात्र त्याची चौकशी न करता त्यांना क्लीन चिट देण्याचेच काम करत आहेत. पुणे मतदार संघातील भाजपच्या उमेदवाराच्या भ्रष्टाचाराबद्दल तर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तर दुसऱ्या एका राज्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा राज्यकर्त्यांना बाजूला सारण्याची हीच चांगली संधी आहे असे त्यांनी सांगितले.
आमदार शरद रणपिसे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी याना निवडणून आणण्याचा चंग बांधला आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. यावेळी सुषमा अंधारे, मोरे यांचीही भाषणे झाले. साहिल केदारी यांनी आभार मानले.
त्यावेळेस ते म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला असून आता हे अन्यायकारक सरकार बदलण्याचा निर्धार ओबीसी समाजाने केला आहे. या मेळाव्यातील तरुणांचा जोश आणि त्यांची आग्रही भूमिका यामुळे पुण्यातून भाजपा नक्की हद्दपार होणार असाविश्वास त्यांनी टाळ्यांचा कडकडाटात व्यक्त केला. या मेळाव्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदी पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.