पुणे- सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याची जगात ओळख आहे. मात्र अशोभणीय तसेच अक्षेपाहार्य विधाने करुन, पालक मंत्री या शहराला असंस्कृत ठरविण्याचे काम करीत आहेत. संस्कृतीची मोडतोड करणाऱ्यांना सुज्ञ पुणेकर निवडून देणार का असा प्रश्न काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे उपस्थित केला.
कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ मेहतर बाल्मिकी समाजाचा मेळावा समाजाचे नेते रवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पार पडला. यावेळी उमेदवार मोहन जोशी, माजी नगरसेवक रशिद शेख, नगरसेवक आविनाश बागवे, माजी नगरसेविका मीना परदेशी, करण मकवानी, हरियाणा सरकारच्या एस.सी. समितीचे माजी सदस्य मनोज बागडे, वीरदास चव्हाण, माजी नगरसेवक
सुनील गोगल, गौतम आर्केडे, मेहतर बाल्मिकी समाजाचे अध्यक्ष कवीराज संगेलिया, समाजाचे सल्लागार चंद्रकांत चव्हाण, शाहु-फुले-आंबेडकर विचार मंचचे हनुमंत गायकवाड, आरपीआय गवई गटाचे राहुल डंबाळे, नरेश जाधव आदी मंचावर उपस्थित होते.
बागवे म्हणाले, ही लोकसभेची निवडणूक नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या पवित्र संविधानाला वाचविण्याची लढाई आहे. दलित, मुस्लिम बांधवावर अन्याय, अत्याचार करुन जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या विचाराविरोधातली ही निवडणूक आहे. त्यामुळे काही जण महामानवांची नावे घेऊन मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या भुलथापांना
बळी पडू नका. मतांचे विभाजन होऊ देऊ नका. आंबेडकर, महात्मा गांधी यांचे सर्वकश विचार घेऊन निष्ठेने काँग्रेसचे काम करीत असलेले उमेदवार मोहन जोशी यांच्या पाठिशी एकीने उभे रहा असे आवाहनही बागवे यांनी केले.
मोहन जोशी म्हणाले, मागील 40 वर्षांपासुन कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. मला शहराच्या प्रश्नाविषयी अस्था आहे. शहरातील प्रश्न सोडवून लोकांची सेवा करण्याची संधी मला द्या. मी दिल्लीत गेलो, तरी जमिनीवर राहुनच शहराच्या विकासाठी प्रयत्नशिल असेन.
मनोज बागडे म्हणाले, आजपर्यंत समाजाच्या उन्नतीचे काम काँग्रेसने केले. सर्वांना सन्मान देणाऱ्या बाबासाहेबांच्या संविधानाला धोका निर्माण झाला आहे. हा धोका दूर करण्यासाठी सर्वांनी महाआघाडीच्या पाठिंशी उभे राहणे नितांत गरजेचे आहे.
रशिद शेख म्हणाले, महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. नोटा बंदीने गरिबांना अधिक गरिब, तर श्रीमंतांना अधिक श्रीमंत केले आहे. भाजपचे धोरण अल्पसंख्याक,दलितांविरोधी आहे. निवडणूकीत स्वतःचा वापर होऊ न देता जागरुकपणे महाआघाडीला मतदानकरा.
आविनाश बागवे, राहुल डंबाळे, कवीराज संगेलिया, नरेश जाधव, करण मकवाणी, सुनील गोगल, चंद्रकांत चव्हाण यांनी भाषणे केली.