पुणे- वर्ष झाले नोट बंदी अमलात आणून , लोकांनी त्रास सहन केला , १२५ लोक रांगेत मरण पावले , अनेकांना आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी मोठे श्रम घ्यावे लागले, प्रत्येकाला आपले पैसे चोरीचे ,हरमाचे नाही कष्टाचे आहेत हे सांगण्यासाठी झगडावे लागले . सारे सहन करून आता वर्ष झाले … पण या जनतेच्या पदरात नेमके नोट बंदीने काय पडले ?कोणता फायदा झाला जनतेला ? असा सवाल आज पुणे शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी येथे केला .
नोटबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीच्या निषेधार्थ आज पुण्यात काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. टिळक रस्त्यावर एसपी कॉलेज ते वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून नोटबंदीचा निषेध नोंदवण्यात आला.पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची सुरूवात नोटबंदीवर आधारित एका पथनाट्य सादरीकरणाने झाली. मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. फलकावर नोटबंदीमुळे जनता त्रस्त सरकार मस्त, नोटबंदीमुळे देश भोगत आहे अश्याप्रकारचे फलके दाखवत होते. मोर्चा कै. वसंतदादा पाटील पुतळा येथे आल्यावर नोटबंदीचे वर्षश्राध्द घालण्यात आले.
प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड,नगरसेवक अविनाश बागवे , कमल व्यवहारे, यांचीही भाषणे यावेळी झाली. शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, नोटबंदी हा एक आर्थिक भूकंप आहे. या निर्णयानंतर देशात सगळीकडे हाहाकार माजला. दुसऱ्या दिवशी पासून बॅंकांमध्ये पाचशे, हजारच्या नोटा बदली करण्यासाठी नागरिकांची रांग लागली. गृहिणी नेहमी आपल्या कुटूंबियांच्या भविष्यासाठी घरच्या कपाटामध्ये पैसे जमा करून ठेवतात. या निर्णयामुळे त्यांनासुध्दा आपले दैनंदिन कामकाज सोडून बॅंकेच्या रांगेत उभे रहावे लागले. ज्या कुटूंबामध्ये लग्न समारंभ होते, जे रूग्ण दवाखान्यात दाखल झाले होते त्यांची सुध्दा या निर्णयामुळे गैरसोय झाली. प्रत्येक नागरिकाला या नोटबंदीमुळे नाहक त्रास झाला आहे.
पंतप्रधानांनी नोटबंदीचा निर्णय घेताना असे सांगितले की या नोटबंदीमुळे देशातल्या काही नागरिकांकडे असलेला काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा होईल, दहशतवादाला आळा बसेल, भ्रष्टाचार दूर होईल, देशाचा कारभार पारदर्शकपणे होईल. परंतु वस्तूस्थिती वेगळी होती. नोटबंदीमुळे देशाच्या विकासदरामध्ये 2% ने घट झाली आहे. त्याचप्रमाणे जानेवारी 2017 ते एप्रिल 2017 पर्यंत देशात 15 लाख लोक बेरोजगार झाले आहेत, शेतकरी-शेतमजूर हवालदिल झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात मंदी आहे त्यामुळे उद्योगजक व व्यापारी नाराज आहेत. परकिय गुंतवणून सुध्दा घटली आहे आणि दैनंदिन मजूरी करून आपले पोट भरणाऱ्या मजूराला आज काम नाही. या परिस्थितीला मोदी सरकारच जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आर्थिक भुकंपाचे उत्तर देशाच्या जनतेला दिलेच पाहिजे. अर्थमंत्री अरूण जेठली वस्तूस्थितीचा विचार न करता नोटबंदीमुळे देशाची प्रगती झाली आहे असे ठामपणे सांगत आहेत हे हास्यास्पद आहे.
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, रोहित टिळक, गोपाळ तिवारी, रशिद शेख, नीता रजपूत, शानी नौशाद,सतीश पवार , पवार ,बुवा नलावडे, जयसिंगराव भोसले ,नगरसेवक रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, अजित दरेकर, मनीष आनंद, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, दत्तात्रय गायकवाड, जॉन पॉल, अनिल सोंडकर, विरेंद्र किराड, शेखर कपोते, सरचिटणीस रमेश अय्यर, काका धर्मावत, डॉ. सतिश देसाई,आबा बागुल , संजय बालगुडे ,सदानंद शेट्टी,महिला अध्यक्षा सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विकास लांडगे, सेवादलाचे रविंद्र म्हसकर, एन.एस.यु.आय. अध्यक्ष भुषण रानभरे, मिलिंद काची, मुकारी अलगुडे, नुरूद्दीन सोमजी, साहिल केदारी आदींसह कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामिल झाले होते.