पुणे (संजय आगरवाल )- देशभर कॉंग्रेसचा प्रचार करता करता पुण्यात आलेल्या राहुल गांधींना आज पुणेरी राजकारणाचा जोरदार झटका बसला .पुण्यात येवून ,ना त्यांना कॉंग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना संबोधित करता आले , ना हजारोच्या जनसमुदायाला संबोधित करता आले. तारांकित हाय फाय हॉटेलात मुठभर कार्यकर्त्यांशी ते बोलले आणि नंतर ज्या भारती विद्यापीठात पुण्याबाहेरच्या विद्यार्थ्यांना भरमसाठ पैका खर्च करून शिक्षणासाठी यावे लागते ,आणि ज्यामध्ये बहुसंख्य जे पुण्यातले मतदार नसावेत अशा विद्यार्थ्यांशी त्यांना संवाद साधावा लागला . विशेष म्हणजे हा संवाद साधताना त्यांना या विद्यार्थ्यांनी दिलेल्या .. मोदी ..मोदी .. अशा घोषणा ऐकाव्या लागल्या ,ज्यामुळे कॉंग्रेसच्या काही नेत्यांना हि जोरदार झटका बसला .यावेळी राहुल गांधींना आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची संधी पुण्यात येवूनही लाभली नाही. काल रात्री पुण्यात आलेल्या या कॉंग्रेस पक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्याच्या वेळेचा असा अपव्यय का आणि कसा झाला यावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांतून संतप्त प्रतिक्रिया आज उमटत होत्या .
गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले विश्वजित कदम यांनी या संवाद यात्रेचे आयोजन केले होते . ते नेमके कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारा साठी कि अन्य कारणासाठी यावर आता मंथन होते आहे . आणि जर जोशी यांच्या प्रचारा साठी गांधी यांना पुण्यात आणले गेले तर गांधी यांच्याकडून जोशी यांचा प्रचार झाला काय ,झाला असल्यास तो पुण्यातील किती मतदारांपुढे झाला? राजकीय प्रचारा साठी नसेल आणले तर .लोकसभेसाठी ते देशभर फिरत असताना मध्येच त्यांचा असा अमुल्य वेळ का खर्ची घातला , असे प्रश्न उपस्थित होणार आहेत.हडपसर येथील एका लॉन्स मध्ये भारती विद्यापीठाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेतला गेला .ज्यास सोशल मिडियातूनही फारसा मोठा लक्ष्यवेधी असा प्रतिसाद मिळाला नाही .सुरुवातीला रंगीबेरंगी लाईट च्या प्रकाश झोतात नृत्ये सादर करणे आणि विविध असम्बधीत संभाषणात राहुल गांधी सारख्या नेत्याचा लोकसभा प्रचारातला अमुल्य वेळ घालविला . राहुल गांधी कॉंग्रेस भवनला आले असते आणि ५ मिनिटे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता तर तिथे कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याचे मार्गदर्शन ऐकता आले असते आणि उमेदवाराचा प्रचार हि झाला असता .पण या ठिकाणी इंग्रजी भाषेत झालेल्या या कार्यक्रमातून पुणे शहराच्या वाटेला काय आले ? असा प्रश्न आता विचारला जातोय .यावेळी राहुल गांधी यांनी आपण मोदींप्रमाणे द्वेशाचे नाही तर प्रेमाचे राजकारण करतो असे सांगण्याचा प्रयत्न करताना मोदींबद्दल आपल्या मनात अजिबात राग नाही, पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्काराची भावना आहे, असे नमूद केले. ”नरेंद्र मोदी यांच्यावर माझं प्रेम आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही. पण ते माझा तिरस्कार करतात. अर्थात, त्यालाही माझी हरकत नाही,” असा टोला लगावत राहुल गांधी यांनी ‘लव्ह यू मोदी’ म्हटले. मात्र राहुल गांधी यांचे हे उच्चार ऐकताच संपूर्ण सभागृहामधून ‘मोदी-मोदी’ असा आवाज घुमू लागला. आणि राहुल बरोबर आलेले नेते अवाक झाले…. याला म्हणतात पुणेरी राजकारणाचा जोरदार झटका …पुण्यात येवूनही प्रचार न करता राहुल गांधी गेले.