पुणे-डोक्यावर देश बचाव लिहिलेल्या टोप्या घालून, ‘;देश बचाव, संविधान बचाव’देश बचाव, लोकशाही
बचाव’ आणि मोदी हटाव, देश बचावचा नारा देत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या खासदार ,
आमदार, माजी आमदार, माजी महापौर, उपमहापौर, नगरसेवक , पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी
मंडईच्या टिळक पुतळ्या जवळ निदर्शने केली. गेली पाच वर्षे खोटे बोलून जनतेच्या डोळ्यात धूळफेक
करणार्या मोदी सरकारला सत्तेवरून घालवावेच लागेच असा निर्धार खासदार वंदना चव्हाण यांनी
व्यक्त केला.
खासदार वंदना चव्हाण, आमदार शरद रणपिसे, दीप्ती चवधरी, उल्हास ढोले पाटील, कमलताई ढोले,
ऍड.अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, प्रशांत जगताप, कमल व्यवहारे, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला,
राजलक्ष्मी भोसले, रजनी त्रिभुवन, दत्तात्रे गायकवाड, रवींद्र धंगेकर, मुकारी अलगुडे, वीरेंद्र किराड,
बाळासाहेब अमराळे, रवी चौधरी, बुवा नलावडे, नीता रजपूत,मुख्तार शेख, लक्ष्मीबाई, कांबळे, जयसिंग
भोसले, डॉ. सुनीता मोरे यांसह शेकडो कार्यकर्ते यावेळी सामील झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्यावतीने ही निदर्शने
करण्यात आली. ‘शेतकर्यांचे नुसते नाव, नाही दिला हमीभव’, ‘नोटाबंदीचा फेरा, अर्थव्यवस्थेचे तीन
तेरा’, ‘विकसाचा आव उगा, मॉडेलचा फुटला फुगा’, ‘देश बचावचे नुसतेच नारे, मोदी तोडतात अकलेचे
तारे’, ‘राफेलचा सौदा, अंबानींचा फायदा’, ‘मोदीजींच्या घोषणा हजार, काम थोडे सोंगे फार’, ‘नुसताच
बोलबाला, कर्जमाफी झाली कुणा’, ‘कचर्याने भरले रस्ते, स्वछ भारत फोटो पुरते’, ‘परिस्थिती
बिकट, सीबीआयही पोपट’ अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेवून, घोषणा देत पुढे दगडूशेठ
गणपती मंदिराजवळ समारोप करण्यात आला.
खासदार वंदना चव्हाण म्हणल्या, गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला खोटी आश्वासणे देवून
फसवत आहे. अनेक खोट्या घोषणा आणि काम काहीच नाही अशी या सरकारची ओळख आहे.
कुठल्याही कामात सातत्य नाही. त्यांच्याबद्दल बोलणार्यांचा आवाज दाबला जात आहे. घटनेने आणि
संविधानाने दिलेला अधिकारावर हुकुमशाही पद्धतीने गदा आणली जात आहे. कोंग्रेस- राष्ट्रवादी
कॉंग्रेस महाआघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार मोहन जोशी, बारामती मतदार संघातील
उमेदवार सुप्रिया सुळे, मावल मतदार संघातील उमेदवार पार्थ पवार आणि शिरूर मतदार संघातील
उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करून मोदींना सत्तेवरून घालवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी
काँग्रेस व मित्रपक्षांच्या मागे उभे राहा असे आवाहन त्यांनी केले.