मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वातील महाआघाडीची पत्रकार परिषद शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेला सुरुवात केली. यावेळी काँग्रेस नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल,हर्षवर्धन पाटील,छगन भुजबळ,जयंत पाटील आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह,जोगेंद्र कवाडे विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. परंतु, विधानसभेत विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेला दांडी मारली. त्यांचा मुलगा सुजय विखे यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे.