नवी दिल्ली – देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि त्यामुळे होणा-या प्रदूषणामुळे विद्युत वाहनांच्या वापरावर जोर दिला जात आहे. केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीवर सवलत देत आहे. जेणेकरुन अधिकाधिक लोक याचा वापर करतील. परंतु भारतासारख्या देशात प्रत्येकालाच नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करणे शक्य नाही. अशातच तेलंगानाची स्टार्टअप E Trio ने हे काम सोपे केले आहे.
एकदा चार्जिंग केल्यानंतर चालेल 150 किमी
आता भारतात Maruti Suzuki आणि WagonR सारख्या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला जाऊ शकतो. तेलंगाना टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ही गाडी एकदा चार्जि़ंग केल्यानंतर 150 किमी पर्यंत चालू शकते. इलेक्ट्रिक किट पूर्णपणे सेफ्टी स्टँडर्ड सोबत तयार केले असल्याचा कंपनीचा विश्वास आहे. ही इलेक्ट्रिक कार कोणत्याही वेळी चार्ज केले जाऊ शकते. तसेच त्याचा मेंटनंस पेट्रोल कारपेक्षा कमी येईल.
भारतातील पहिली अशी कंपनी
E Trio कंपनीत इलेक्ट्रिक किट स्थापित करण्याचा पर्याय देते. भारत सरकारच्या वतीने हे काम करण्याची परवानगी देण्यात आलेली E Trio भारतातील अशी पहिलीच कंपनी आहे. कंपनीला सरकारी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनच्या वतीने मान्यता मिळाली आहे. प्रत्येक महिन्यात इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी किट स्थापित करून 1500 कार तयार करण्याची आमची क्षमता असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
चीन आणि जपान मधून येणार इलेक्ट्रिक किट
या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक किटला चीन आणि दक्षिण कोरियामधून मागवण्यात येणार आहे, तर कंट्रोलरची निर्मिती स्वत: कंपनी करणार आहे. कंपनी अशाप्रकारची कार बनविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून टेस्टिंग करत आहे. स्टार्टअप आधारित E Trio कंपनी विद्युत किट स्वस्त आणि अधिक प्रभावी बनविण्यासोबतच बॅटरी चार्जिंग वेळ 25 मिनिटे करण्यावर काम करत आहे. या बाबतीत त्यांची जपानी आणि थाई कार निर्मात्यांशी चर्चा सुरू आहे.