भाऊबीजेनिमित्त १० हजार साड्या गरीब बहिणींना भेट देण्याचा चंद्रकांतदादांचा संकल्प -आणि त्यासाठी खुले आवाहन
पुणे- आतापर्यंत अडीच हजार साड्या जमा झाल्यात पण सुमारे १० हजार साड्या गरजू ,गरीब महिलांना भाऊबीजेची भेट म्हणून साड्या वाटपाचा आपला संकल्प आहे असे कोथरूड चे आमदार ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘मायमराठी’ शी बोलताना सांगितले .नव्या साड्या आपण वाटणार आहे याबाबत समाजातील काही संस्था ,व्यक्ती पुढे आल्यास आणि त्यांनी हाथभार लावल्यास आपला संकल्प निश्चित पूर्ण होईल असे ते म्हणाले ,
मनसे आणि पक्षातील कोणी यास विरोध करण्याचे कारण नाही .खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांच्यासमवेत दिवाळी साजरी करा असा संदेश दिला आहे आणि हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी देखील मुंबईतील डबेवाले ,घरगडी अशा लोकांना फराळ वाटप करून दिवाळी साजरी केली . मध्यंतरी मी १० जून ला माझ्या वाढदिवसाच्यादिवशी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील मुलीना ३० हजारड्रेस चे कापड आणि ५ हजार बूट वाटप केले होते .यात मला चांगला अनुभव आला . साड्या वाटपाची कल्पना सुचली तेव्हा कोल्हापुरातुल गांधीनगर मधील साड्यांच्या सेंटर मधून नव्या साड्या मला आल्या .२ ते ३ हजार साड्या आतापर्यंत आल्यात १० हजार तरी साड्या मिळाव्यात आणि त्या गरजूंपर्यंत पोहोचवाव्यात अशी इच्छा आहे . कोथरूड मधील त्या त्या भागातील कार्यकर्त्यांची यासाठी मदत घेतो आहे . तेत्यांना नावे ,घरे माहिती असतात . असे कार्यकर्ते या साड्या पोहोचवतील असे चंद्रकांत दादा पाटील म्हणाले .
मनसे किंवा कोणी यासाठी विरोध करण्याचे कारण नाही आता काही आचारसंहितेची अडचण देखील नाही ,पण भाजपची लोकप्रियता वाढेल असे काही कार्यक्रम घेतले तर साहजिक विरोधी पक्ष त्यास विरोध करतील त्याकडे लक्ष देण्याची मला गरज वाटत नाही साड्या वाटपाचा असा जाहीर कार्यक्रम नसेल ,घरोघरी जाऊन कार्यकर्ते त्या वाटतील असे ते म्हणाले .