पुणे-कोथरुड मधून विजयी झालेल्या चंद्रकांत पाटील यांच कोथरुड मतदारसंघात भाजपच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले.फटाके आणि गुलाल उधळत भाजपने विजयाचा जल्लोष साजरा केला…यावेळी त्यांनी कोथरुड मधील शिवाजी पुतळ्याला अभिवादन केले.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,कोथरुडमध्ये मी बाहेरचा आहे असा प्रचार केला गेला, मात्र मला कोथरुडकरांनी स्वीकारले त्याबद्दल आभार…
राज्यातील निकालाबाबत फार मोठा धक्का बसला अस म्हणता नाही येणार, उलट जिंकण्याचा रेट 77 टक्के झालाय…अनेक ठिकाणी बंडखोरी झाली त्या संपवता आल्या नाहीत म्हणून फटका…
महाराष्ट्रात भाजप सेना युतीचंच सरकार येणार, दुसरा कुणाचा काही विचारच नाही.निवडून आलेल्या 22 अपक्ष आमदारांपैकी 15 आमदारानी मुख्यमंत्री यांना पाठींबा दिलाय…
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा सातारा आणि परळीचा पराभव आमच्या मनाला लागलाय, पराभूत मत्र्याविषयीच विश्लेषण केले जाईल.
शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येतील अशी सुतराम शक्यता, नाही उद्धवजी बाळासाहेब यांचे वंशज आहेत ते काँग्रेसला सोबत घेणार नाही.
कोथरूडकर जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानून कोथरूडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजयानंतर आज श्री पाटील यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले, यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, कोथरूडच्या सुज्ञ नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचा शतश: आभारी आहे. या विधानसभा निवडणुकीत कोथरूडच्या विकासाचा जो शब्द इथल्या जनतेला दिला होता, तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याच बरोबर राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने जो जनादेश दिला आहे, त्या बद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.
यावेळी कोथरूड विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विजयानंतर श्री. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महर्षी कर्वे यांना वंदन केले. तर कोथरूडचे ग्रामदैवत श्री. म्हातोबाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.