अकरावी,बारावीची वर्षेच घडवितात करिअर -चाटे सर (व्हिडीओ)
पुणे-दहावी झाली म्हणजे सारे काही झाले असे उसासे टाकू नका ,त्यापुढेच खरी स्पर्धा आणि खरे शिक्षण सुरु होते .अकरावी आणि बारावीची वर्षेच विद्यार्थ्याचे करिअर घडवितात त्यामुळे या दोन वर्षांवर विद्यार्थ्यांसह पालकांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मत चाटे शिक्षण समुहाचे पुण्यातील संचालक प्रा. फुलचंद चाटे यांनी व्यक्त केले आहे .
‘मायमराठी ‘च्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालक यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करावे या हेतूने चाटे सर वेळोवेळी आपली मते मांडत आले आहेत .आज ‘माय मराठी ‘शी बोलताना ते म्हणाले ,’दहावीनंतर महाराष्ट्रात मोठा ड्रॉ बॅक दिसतो .या परीक्षेनंतर मोठ ओझ उतरलं असे समजणारे विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने आहेत . पण दहावीनंतरच खरी स्पर्धा आणि शिक्षण सुरु होते .अकरावी बारावी ची दोन वर्षे विद्यार्थ्याचे करिअर घडवितात .पण काही जन कॉलेज लाईफ एन्जॉय करण्याच्या मूड मध्ये असतात तर काही पदवीधर होऊनंतर पाहू च्या मूड मध्ये असतात .सायन्स शाखेतून विद्याथी प्रत्येक क्षेत्रात जाऊ शकतो .आणि ज्याच्याकडे सक्सेस आहे त्याच्याकडेच जग पाहते .त्याचंच कौतुक होते .परीक्षेत शहरी किंवा ग्रामीण असा भेद नसतो .१ मार्कचे महत्व तेव्हा कळते जेव्हा एका मार्कावरून प्रवेश नाकारला जातो .आणि याच काळात विद्यार्थ्याचं करिअरच्या दृष्टीने संगोपन हा भारतातील पालकांपुढे असलेला मोठा प्रश्न असतो . आपल्या पाल्याला अनावश्यक गोष्टी किंवा करिअरला बाधा निर्माण करतील अशा गोष्टीकडून दूर ठेवणे हा खरा प्रश्न असतो .अशातच महाराष्ट्रातील ३०० ते ३५० इंजीनिअरिंग कॉलेजेस केवळ बेरोजगारांची फौज बाहेर काढण्याचे काम करीत आहेत .बेरोजगारांच्या रांगेत उन्भे करणारे शिक्षण घेवू नका त्या एवजी डिग्री हाती पडताच जॉब तुमच्याकडे चालत येईल असे शिक्षण घेणे आज गरजेचे आहे या सर्व अनुषंगाने आम्ही चाटे ज्युनिअर कॉलेज ची रचना केली आहे असे ते म्हणाले …पहा आणि ऐका ..नेमके चाटे सर नेमके काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात …..