पुणे- सोलापूर रोडवरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायती समोर एर्टिगा आणि ट्रकमध्ये रात्री १२.५० मि. झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्व मयत यवत येथील रहिवासी आहेत. ह्यातील सर्व जण महाविद्यालयाीण विद्यार्थी आहेत. या घटनेचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहे.
अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजिज अशी सर्व मृतांची नावे आहेत. सर्व मयत यवत येथील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी सर्व यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते आणि आज घरी सर्व येत होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर सोलापूरच्या दिशेने जाणार्या एर्टिगा या चार चाकी गाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दुभाजक ओलंडुन ट्रकला समोरच्या बाजूने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजिज अशी सर्व मृतांची नावे आहेत. सर्व मयत यवत येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे तब्बल दोन किलो मीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
दोस्ती जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी…
अपघातातील ८ जण यवतमधील जनविद्या विकास मंदिर या शाळेत २०१४ – १५ च्या दहावीच्या बॅचमध्ये एकत्र होते. यातील सर्व जण पहिल्या इयत्तेपासून वर्ग मित्र होते.
दत्ता गणेश यादव हा जेएसपीएम कॉलेज (उंड्री) येथे शिकत होता. निखिल चंद्रकांत वाबळे हा विश्वराज हॉस्पिटल येथे बाऊन्सर म्हणून काम करीत होता. विशाल सुभाष यादव हा जेएसपीएम कॉलेज, वाघोली येथे शिकत होता. शुभम भिसे (कासुर्डी) हा उरुळी कांचन येथील कॉलेजमध्ये बीसीएसला होता.
अक्षय चंद्रकांत घिगे हा हडपसर येथील आणासाहेब मगर महाविद्यालयात बीसीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. विशाल सुभाष यादव हा यवत येथील माजी उपसरपंच सुभाष यादव यांचा मुलगा आहे.
सोनू उर्फ नूर महम्मद दाया हा लोणी काळभोर येथे बीए़च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. अक्षय भरत वायकर हा घरी व्यवसाय करीत असे. जुबेर अजित मुलानी हा एके ठिकाणी कामाला जात होता. परवेज अश्फाक अत्तार हा पूना कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकत होता.
परवेजचे वडील आठवडी बाजारामध्ये काथ्या साबण विक्रीचे दुकान लावतात. त्यांच्या त्या व्यवसायावर त्यांनी परवेजला बीसीएच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. तो शेवटच्या वर्षाला होता. या वर्षी पास झाल्यावर एका चांगल्या कंपनीत कामाला लागून वडिलांचे स्वप्ने पूर्ण करायचे आहे, असे आम्हाला परवेज सांगायचा. पण त्याच्या अपघाती निधनामुळे त्याचं हे स्वप्न अपूर्णच राहिले, असे परवेजचा भाऊ मोहसीनने सांगितले.