महिलांना केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारच्या योजना-विजया रहाटकर
पुणे-मोदी सरकार हे पहिले सरकार आहे, ज्याने महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना आखल्या. ज्या योजनांचा लाभ २० कोटी महिला लाभार्थींना झाला. योजना महिलांपर्यंत पोहोचल्या म्हणजे तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचल्या. याचा ङ्गायदा या निवडणुकीत महायुतीला नक्की होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती रहाटकर बोलत होत्या. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, स्वरदा बापट यांची प्रमुख उपस्थिती होती.
रहाटकर पुढे म्हणाल्या, ‘प्रधानमंत्री आवास योजनेचा २ कोटी महिलांना, शौचालय योजनेचा ९ कोटी महिलांना, उज्ज्वला योजनेचा ७ कोटी महिलांना, मुद्रा योजनेचा १६ कोटी महिलांना आणि सौभाग्य योजनेचा २ कोटी महिलांना लाभ झाला. त्यामुळे देशात भाजपला अभूतपूर्व प्रतिसाद आहे. विरोधी पक्षात मात्र गोंधळाची स्थिती आहे. भाजप पूर्ण बहुमताने देशात सत्तेत येईल.’
रहाटकर पुढे म्हणाल्या, ‘आपपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महागाई हा मु‘य मुद्दा होता. ही पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये महागाई हा मुद्दा नाही. १९९१ नंतर महागाईचा दर सर्वात कमी म्हणजे २.५७ टक्के इतका आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर आहेत.’