राज ठाकरे दिवसा दिवसाला भूमिका बदलतात- भंडारी (व्हिडीओ)
पुणे-राज ठाकरे यांच्या भाषणाने ना त्यांच्या उमेदवाराला मते मिळाली ,ना आता त्यांना उमेदवार मिळाले ..त्यांची भाषणे मनोरंजनासाठी लोक ऐकतात …त्यांच्या भूमिका दिवसा दिवसाला बदलत असतात . हरिसाल गावातील लाभार्थी ला घेवून टीका करण्यात त्यांना आनंद घेता येतो, घेवू द्यात . अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी ठाकरे यांच्या भाषणांचा झंजावात आज मोडीत काढण्याचा प्रयत्न केला . एवढेच नाही तर स्मृती इराणी यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावर पुण्यात तक्रार झाल्या संदर्भात प्रश्न आला तेव्हा त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित केला .आज पुण्यात भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते,
पानशेत पूरग‘स्तांच्या घरांचा मालकी हक्काचा प्रश्न गेल्या पंचावन्न वर्षांपासून प्रलंबित होता. कॉंगेस राजवटीत केवळ आश्वासने दिली गेली. चटई क्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) हवेत घोषणा केल्या. मुळात जागेचीच मालकी मिळत नाही तोपर्यंत एफएसआयचा काही संबंध येत नाही. युती सरकारने पूरग‘स्तांचा मालकी हक्क मान्य केला असून, पुढचे प्रश्न मार्गी लागतील असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. शहराध्यक्ष योगेश गोगावले यावेळी उपस्थित होते.
मंगेश खराटे यांचा भाजपमध्ये प्रवेश
कॉंग्रेसचे शहर चिटणीस आणि पानशेत पूरग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. पानशेत पूरग्रस्तांना खर्या अर्थाने न्याय भाजपने मिळवून दिला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत असल्याची घोषणा खराटे यांनी केली.