महात्मा फुलेंच्या विचारांवर आधारित सामाजिक विकास- गिरीश बापट यांची ग्वाही
पुणे-बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणार्या आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर आधारित सामाजिक विकासासाठी आम्ही कटिबध्द असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९३ व्या जयंतीनमित्त ‘समता भूमी’ येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बापट यांनी अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
बापट म्हणाले, ‘समाजातील विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुला-मुलींचे शिक्षण यावर ज्योतिबा फुले यांनी भर दिला. सामाजिक न्यायाबाबत त्यांचे विचार सुस्पष्ट होते. त्यांच्या विचारांच्या आधारेच आम्ही राज्यकारभार करीत आहोत.’
बापट पुढे म्हणाले, ‘महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित समाजाचा विकास करण्याच्या उद्देशाने सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. इतर मागासवर्गीय समाजासाठी राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. राज्यात ३२ टक्के इतर मागासवर्गीय समाज आहे. त्यांचा विकास करण्यासाठी या मंत्रालयामार्फत २४ योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. इतर मागासवर्गीय समाजासाठी कि‘मीलेअरची वार्षिक उत्पन्न मर्यादा साडेचार लाखांहून सहा लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांमुळे या समाजाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे तो महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्वास वाटतो.’
नगरसेवक राजेश येनपुरे, सम‘ाट थोरात, महेश लडकत, आरती कोढरे, मनिषा लडकत, विजयालक्ष्मी हरिहर, हेमंत रासने, अजय खेडेकर, विशाल धनवडे, अविनाश साळवे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, संदीप लडकत, विष्णू हरिहर, राजेश बारगुजे, संदीप गायकवाड, योगेश पिंगळे, मंजिरी धाडगे, वैशाली नाईक, प्रमोद कोंढरे, ऍड विवेक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.