पुणे- पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप, सेना, आरपीआय (ए), रासप व शिवसंग‘ाम महायुतीचे उमेदवार गिरीश बापट आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचनताई कुल यांनी मिरवणुकीने जाऊन आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. श्री. बापट यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे दुपारी बारा वाजता उमेदवारी अर्ज सादर केला.
राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोर्हे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, शिवसंग‘ामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळा कदम, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शिवसंग‘ामचे शहराध्यक्ष भरत लगड, रासपचे शहराध्यक्ष सनी रायकर, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, राहुल कुल, भीमराव तापकीर, विजय काळे, प्रा. मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, महेश लांडगे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृह नेता श्रीनाथ भिमाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिरवणुक सुरू होण्यापूर्वी गिरीश बापट यांनी प्रमुख नेत्यांसह पुण्याचे ग‘ामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. कसबा गणपती मंदिरापासून सुरू झालेल्या मिरवणुकीचा ङ्गडके हौद चौक, दारूवाला पूल मार्गे नरपतगिरी चौकात समारोप झाला. महायुतीचे दहा हजारहून अधिक कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. सर्व आमदार, नगरसेवक जथ्या जथ्याने मिरवणुकीत सामील होत होते. शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑङ्ग इंडिया (ए), रासप, शिवसंग‘ाम, लोकजनशक्ती पार्टी, पतित पावन संघटना, हिंदू एकता आंदोलन आणि विविध दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांची सं‘या लक्षणीय होती.
मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी शुभेच्छा देणार्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ध्वनिक्षेपकावर प्रचाराची गाणी लावून स्वागत करण्यात येत होते. महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले. ङ्गटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, बँड पथकावरील देेशभक्तीपर गाणी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या जयघोषाच्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. मैं भी हूं चौकीदार, ङ्गिर एक बार मोदी सरकार, पुण्याची ताकद गिरीश बापट या घोषणा कार्यकर्ते उत्स्ङ्गूर्तपणे देत होते. महिला कार्यकर्त्या आणि युवकांचा मोठा सहभाग होता. मै भी हूं चौकीदार टोप्या घातलेले कार्यकर्ते लक्षवेधत होते. आरपीआयचे कार्यकर्ते झेंडे घेऊन मोठ्या सं‘येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. उन्हाची तीव‘ता लक्षात घेऊन कार्यकर्त्यांना पाणी व ताक वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी सव्वा अकराच्या सुमाराला मिरवणुकीत नरपतगिरी चौकात पोहोचली. या ठिकाणी मिरवणुकीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी महायुतीचे दहा हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या सभेत बोलताना गिरीश बापट म्हणाले, ‘आयुष्यभर घाम गाळणार्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी सलाम करतो. कार्यकर्ता हा संघटनेचा आत्मा आहे. अशा कार्यकर्त्यांच्या जोरावरच पक्षाचा विचार जिवंत राहीला आहे. आमचा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आमच्याकडे घराणेशाही नाही. गेल्या पन्नास वर्षांत कॉंग‘ेसला देशाचा विकास करता आला नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. त्यामुळे देशात चांगले वातावरण आहे. नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार आहे. आम्ही घराणेशाहीत जन्माला आलेले कार्यकर्ते नाहीत. आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक, कुटुंब आणि शिक्षकांचे चांगले संस्कार आहेत. देश, धर्म आणि समाजासाठी काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. पंधरा वर्षे महापालिकेत नगरसेवक, पंचवीस वर्षे आमदार अशी जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली. आता मी लोकसभेत प्रतिनिधित्व करावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे मी या निवडणुकीस उभा राहात आहे. घरोघरी जाऊन विकासाची कामे मतदारांपर्यंत पोहोचवा. गहाळ राहू नका.’
कांचन कुल म्हणाल्या, ‘सर्वसामान्य जनता आणि महायुती आमच्या मागे खंबीरपणे उभी आहे. कार्यकर्त्यांची मोठी ङ्गळी कार्यरत आहे. कशाला कुणाची भिती पाठीशी आहे महायुती. त्यामुळे बारामतीत महायुतीचा विजय निश्चित आहे.’
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या दहाही जागा जिंकायच्या आहेत. त्याची सुरूवात पुणे आणि बारामतीपासून होणार आहे. या जागा नुसत्याच जिंकायच्या नसून प्रचंड मताधिक्याने जिंकायच्या आहेत. पुण्याची जागा देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणायची आहे. महाराष्ट्रात आणि बारामतीत कांचनताईंच्या हस्ते परिवर्तन घडणार आहे.’
डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या, ‘पुणे तेथे काय उणे असे म्हटले जायचे परंतु आता पुणे तेथे राष्ट्रवादी व कॉंग‘ेस उणे असे म्हणावे लागणार आहे. दोन्ही उमेदवारांना लाखो मतांनी निवडून द्यायचा संकल्प करू या.’ महादेव जानकर म्हणाले, ‘बारामतीत महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहे. देशातील परिवर्तनाची सुरूवात पुण्यापासून होणार आहे.’ विनायक मेटे म्हणाले, ‘महायुतीची वज‘मूठ अभेद्य आहे. देशाला व राज्याला पुढे नेण्याचे काम पूर्ण करण्यासाठी बापट व कुल यांना निवडून द्या.’ विजय शिवतारे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील परिवर्तन बारामतीपासून होणार आहे. सेल्ङ्गीताई ग‘ीत बसणार आहेत आणि कांचनताई दि‘ीत जाणार आहेत.’
खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, शिवसेनेचे संपर्कप्रमुख, बाळा कदम, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे यांची ही भाषणे झाली. निवडणूक प्रमुख आमदार विजय काळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.