पुणे-
कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराची मोठी संधी असलेले उड्डाणपूल बांधण्यावर भर दिला, त्यामुळे गेल्या दहा वर्षात पुणे हे शिक्षणाचे माहेरघर न राहता वाहतूककोंडीचे माहेरघर बनले. १० वर्षात निव्वळ ‘मेट्रो’ च्य फायली त्यांनी चाळल्या आम्ही २ वर्षात मेट्रो प्रकल्प अंतिम टप्प्यात आणला . असा घणाघाती आरोप करीत आज पुन्हा भाजपने मेट्रो आम्हीच आणत असल्याचे स्पष्ट करीत उड्डाणपुलाद्वारे काँग्रेस राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केल्याचे आरोप सोशल मीडियाद्वारे केले आहेत.
गेल्या २ महिन्यांपासून पुणे शहर भाजपने सोशल मिडीयावर विविध कार्यक्रम आणि प्रतिक्रिया , श्रद्धांजली च्या पोस्ट करता करता आता काँग्रेस राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीच्या तोंडावर शह देणारी मोहीम आखली आहे .
पुणे शहर भाजपने आपली प्रचारमोहीम सोशल मिडीयावरून सुरु केली आहे . या मोहिमेत आज टाकलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे कि,
पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षम कार्यप्रणालीचा प्रत्यय देत भाजपा सरकारने केवळ दोन वर्षात मेट्रो प्रकल्पाला मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आणले आहे. आघाडी सरकारच्या काळात मुंबई मेट्रो प्रकल्पासोबत पुण्याच्या मेट्रोवरही काम होणे अपेक्षित होते, पण केंद्र, राज्य व महानगरपालिकेत सत्ता असूनही केवळ फाईल या टेबलावरून त्या टेबलावर नेण्यापलीकडे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत परिणामी गेल्या दहा वर्षापासून हा प्रकल्प मंजूरीच्याच प्रतिक्षेत अडकला. कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणतीही दूरदृष्टी न दाखवता भ्रष्टाचाराची मोठी संधी असलेले उड्डाणपूल बांधण्यावर भर दिला, परिणामी पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढली व गेल्या दहा वर्षात पुणे हे शिक्षणाचे माहेरघर न राहता वाहतूककोंडीचे माहेरघर बनले. मेट्रोसाठी अत्यावश्यक असलेल्या डिपीआर मंजूरी मिळवण्यालाच आघाडी सरकारला अपयश आले. पण भाजपा सरकारने केवळ दोन वर्षात सर्व मंजूरी मिळवत अंतिम मंजूरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला.
जागतिक बँकेकडून कर्ज मिळवून आर्थिक अडथळा दूर केल्यानंतर लगेच मेट्रो प्रकल्पाला पीआयबीकडे मंजूरीसाठी पाठवले गेले होते. पीआयबीकडून मंजूरी मिळाल्याने मोठा अडथळा दूर होऊन हा प्रकल्प अंतिम मंजूरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे गेला आहे.
असे म्हटले आहे .