पुणे-
आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे व शारीरिक श्रमाची कमतरता यामुळे शरीराचे वजन वाढते. अशा स्थितीत कमी आहार, वजन नियंत्रण औषधे वा चरबी काढण्याच्या शस्त्रक्रिया करूनही वजन कमी होत नाही. मात्र दिवसातून दोनदाच जेवणाचा नियम करून कमीतकमी ३ महिने यात सातत्य ठेवणे तसेच गोड कमी खाणे किंवा पूर्ण टाळणे आहारातील प्रथिने वाढवणे तसेच हवे ते पदार्थ खाऊन वजन नियंत्रित ठेवता येते. असे प्रतिपादन सुप्रसिध्द आहार तज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यानी केले. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सुशिल मेंगडे यांनी केले.
कोथरूड येथील शिक्षकनगर मैदानवर श्री संकल्प सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध या विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे आरोग्यदायी व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रविण दबडघावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे प्र-कुलगुरू एन. एस. उमारणी, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहर महिला आधाडीच्या अध्यक्षाशशिकला मेंगडे, नगरसवेक राजाभाऊ बराटे, किरण दगडे पाटील, दिलीप वेडेपाटील, जयंत भावे, दिपक पोटे नगरसेविका छाया मारणे हर्षाली माथवड, वासंती जाधव, मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुध्दे, श्रध्दा प्रभुणे, अल्पना वरपे आदी मान्यवर उपस्थित होते. आजघ्या काळात ९९ टक्के लोकांनी लठ्ठपणा स्वत: कमवलेला असतो. चहा, नाष्टा ,जेवण , सतत खाणे यामुळे आपल्या शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त इंश्युलीन तयार होते, ज्या वेळेस आपण काही खातो, त्यावेळी इंन्शुलीन तयार होते. गरजेपेक्षा जास्त इंन्शुलीनमुळे मेद अर्थात चरबी वाढते. कमी इंन्शुलीन तयार झाले तर शरीरातील चरबी कमी होईल, असे सांगून डॉ. दीक्षित म्हणाले.दिवसातुन दोन वेळा जेवण करणे फायद्याचे आहे. मधल्या वेळात काहीही खाऊ नका. गरज वाटल्यास घरातील ताक अथवा पाणी प्या. त्याचबरोबर आठवड्यातले पाच दिवस ४५ मिनिटे भराभर चालणे अधिक चांगले ठरते, असा सल्ला त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी तर आभारप्रदर्शन उदय कड यांनी केले.