पुणे-शिवसेनेसोबत युती नाही झाली तरीही भाजपचे राज्यात ४० खासदार निवडून येतील, असा दावा करणाऱ्या रावसाहेब दानवे यांना आता भाजपमधूनच घरचा आहेर मिळाला आहे.भाजपचे सहयोगी सदस्य असणाऱ्या संजय काकडे यांनी त्यांचा हा दावा खोडून काढला आहे.खुद्द दानवे यांचेच सीट युती झाली नाही तर धोक्यात येईल .तर दुसरीकडे पुण्यातून देखील हे नवे ते जुने असा भेद निवडणुकीच्या तोंडावर निर्माण केला जातोय .नव्यांना जर अशा पद्धतीने वागणूक दिली तर पुण्यात खूप मोठे नुकसान होईल हे मी सांगण्याची गरज नाही असेही ते म्हणाले हे सर्व सांगताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस हेच आपले नेते असून त्यांच्या कामकाज पद्धतीवर मात्र विश्वास व्यक्त केला आहे .
एका वृत्त वाहिनीला काकडे यांनी मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे कि ,दानवे यांनी ४० जागा मिळतील हे कुठल्या आधारावरम्हटले हे मला ठाऊक नाही , पण जर शिवसेना आणि भाजपची युती नाही झाली तर रावसाहेब दानवे यांचाच दीड लाख मतांनी पराभव होईल, अशी भविष्यवाणी काकडे यांनी केली आहे.एवढेच नाही तर त्यांच्या मतदार संघातून अर्जुन खोतकर यांचे त्यांना आव्हान ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी काकडे म्हणाले, रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात माझा चांगला संपर्क आहे. त्यांच्या मतदारसंघात मी सर्व्हे केला असून त्यामध्ये दानवे यांची जागा धोक्यात असल्याचे समोर आले आहे. जवळपास दीड लाख मतांनी त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे..मला राजस्थानचा सर्वे करायला मुख्यमंत्र्यांनीच पाठवले होते ,महाराष्ट्राचा सर्वे करायला सांगितला तर तो हि मी करेल ,मध्यंतरी मी जरी शरद पवार ,अशोक चव्हाण यांना भेटलो असलो तरी माझे आणि फडणवीस यांचे चांगले संबध आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजावर मी नाराज नाही. पण पक्षातील काही लोकांच्या कामकाजावर मी नाराज आहे. नवीन आणि जुने असा भेद जो पुण्यातून केला जातो आहे तो चुकीचा आहे असे मला वाटते हे नवीन ,हे जुने विसरून निवनुकांच्या तोंडावर एकत्रित काम करायला हवे आहे. नव्या लोकांची गरज लागणारच आहे , त्यांना डावलले तर पुण्यात खूप मोठे नुकसान होईल हे मी सांगण्याची गरज नाही . असे ते म्हणाले