पुणे- काळ्या पैशाची होऊ देत राख पण प्रामाणिक पणे मेहनतीने पैसे कमविलेल्या माणसांना का देता त्रास अशी भावना देखील आज काही पुणेकरांमध्ये होती . याच बरोबर कोणकोणत्या गाब्बरांचे किती पैसे सरकारच्या हाती लागले ? याचा सवाल देखील जनतेतून होत होता .
काळा पैसा बाहेर काढण्यास कोणाचा विरोध नाही , पण … चार अपराधी सुटले तर चालतील , पण एकाही निरपराधाला शासन होता कामा नये , अशा स्वरूपाची आपली घटना आहे , पण आज
निरपराधी लोक आपल्या मेहनतीचे , स्वकष्टाचे पैसे राखण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत , हेच आहेत काय त्यांच्यासाठी अच्छे दिन ?असा हि प्रश्न विचारला जातो आहे .स्विस बँकेतल्या पैशांचे काय झाले , भल्या भल्या १००-२००- ४०० आणि हजारो कोटींचे धनी असलेल्या भामट्यांची नावे तुम्हाला माहिती नव्हती काय ? मग सर्वाधिक बहुमत देवूनही थेट त्यांच्यावरच का नाही ‘मोदी बॉम्ब’ टाकला , ना पाकिस्तान वर, ना ‘त्यांच्या ‘ वर… मग सार्वजनिकरीत्या असा ‘मोदी बॉम्ब’ टाकण्याची नौटंकी करून ,का आणले सामान्य माणसाला ही जेरीस… …अशी अनेक प्रश्ने मोदी आणि भाजपा यांच्यासाठी पुढे उभी ठाकली जात आहेत .