सोलापूर –काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध आहे की पाठिंबा आहे, याचा खुलासा करावा, असं आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा आणि हिताचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा तेव्हा काँग्रेस वेगळी भूमिका घेते. चांगल्या निर्णयाला साथ देता येत नसेल तर किमान गप्प तरी बसा, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोलापुरातील महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाप्रसंगी केली.
राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक , कॉंग्रेसचे जयकुमार गोरे आणि राष्ट्रावादीचे राणा जगजितसिंह पाटीलमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप यात्रेवेळी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपाचा झेंडा दिला. याचबरोबर जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे नातेवाईक राणा जगजित सिंह यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
अमित शहा म्हणाले ,शरद पवार यांचे भतीजे यांनी 74 हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला. हजारो कोटींचा निधी दिला पण एक थेंब पाणी मिळाले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचारामुळेच महाराष्ट्र मागे पडला. मात्र देवेंद्र फडणीस यांनी मागील पाच वर्षात विकास कामे करून महाराष्ट्र नंबर वन बनवला. हा काळ सुवर्णाक्षरांत लिहिला जाईल. काँग्रेस मधील गांधी घराणे हे राजकारणाला घरचा ठेका समजतात, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोलापुरातील महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाप्रसंगी केले.
‘शरद पवार यांची वक्तव्ये वाचली. पवार तुम्ही सत्तेत होता त्यावेळेस महाराष्ट्राला काय दिले हे अगोदर सांगा, असे आव्हानही शहा यांनी पवार यांना दिले. तसेच हा प्रश्न पवारांना सोलापूर दौऱ्यावेळी विचारण्याचे आवाहन सोलापूरकारांना केले.
पाकिस्तानच्या सर्व स्वप्नांवर पाणी फेकण्याचे काम मोदींनी केले. राहुल गांधी आणि शरद पवार यांनी 370 हटवले याबद्दल आपली भुमिका स्पष्ट करावी. भाजपाने ज्या – ज्या वेळी विरोधक म्हणून काम केले त्यावेळी देशाचे प्रश्न आले त्यावेळेस भाजपने काँग्रेस सरकारला समर्थन दिले. पुन्हा एकदा देवेंद्र फडणीस यांना मुख्यमंत्री बनणार का, असा सवालही शहा यांनी कार्यकर्त्यांना केला.
गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी म्हटले की, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी यशस्वीपणे कार्यकाळ पूर्ण केला. यावेळी त्यांनी भाजपा व शिवसेनाला दोघांनाही सोबत घेऊन काम केले. तर चंद्रकांत पाटील यांना आम्ही थांबवले आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर त्यांनी भाजपाचा संपूर्ण दरवाजा उघडला तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिवाय कोणीच काँग्रेस व राष्ट्रवादीत राहणार नाही. तसेच, फडणवीस सरकारवर एकही घोटाळ्याचे आरोप नाहीत. तर अजित पवार यांनी करोडोंचा सिंचन घोटाळा केला असल्याचेही शाह म्हणाले.
ईव्हीएमवरून शरसंघान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये विरोधकांच्या ईव्हीएमवरील टीकेवरून शरसंधान साधले. सत्तेची मुजोरी होती म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने नाकारले. बारामतीत सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं, तर सोलापुरात जय सिद्धेश्वर महास्वामी निवडून आले तर ईव्हीएम वाईट असे कसं, असा सवालही उपस्थित करत परिक्षेला नापास झालेल्या मुलाचे उदाहरण दिले. 2004 ते 2014 च्या निवडणुका ईव्हीवर झाल्या. तेव्हा ईव्हीएम खराब नव्हते का, मोदी जिंकल्यावरच ईव्हीएम खराब झाल्याची ओरड मारू लागल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. विरोधकांची झोप उडवणारी महाजनादेश यात्रा आहे. पाच वर्षात काय केले याचा हिशोब देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढलेली आहे. आभार मानण्यासाठी, हिशोब देण्यासाठी, सूचना मागण्यासाठी ही यात्रा काढल्याचे पाटील यांनी सांगितले. आपल्या पक्षातील आमदार-खासदार हे भाजप-शिवसेनेचे जात असल्यामुळे शरद पवार यांचा त्रागा झाला त्यामुळेच पत्रकारांवर ते चिडले अशी टीका करताना पाटील यांनी उदयनराजे काय पोर आहेत का, असा सवालही केला.राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे लवकरच करणार भाजप प्रवेश करतील. विरोधकांना नेहमीच जातीच राजकारण दिसतं, असेही पाटील यांनी सांगितले