मुंबई. भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आणि वेगवेगळ्या मुख्य कार्यांसाठी महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या जवाबदा–याही निश्चित झाल्या आहेत. ह्या जवाबदा–यांमध्ये महाराष्ट्रातील ज्या फक्त 6 नेत्यांना जवाबदा–या सोपवण्यात आल्या आहेत, त्यांमध्ये– नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, नारायण राणे, मंगल प्रभात लोढा आणि विनय सहस्त्रबुद्धे आहेत. भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने लोकसभा निवडणूक अभियानाच्या विविध समित्यांची ही सूची जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जवाबदा–यांसाठी भाजपाने अनेक समित्या बनवल्या आहेत. त्यात पक्षाचे संकल्पपत्र समिती (निवडणूक घोषणापत्र समिती) मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे को ह्यांना मुख्य स्थान मिळाले आहे. राणेंच्या शिवाय रेल्वे मंत्री पीयूष गोयलसुद्धा संकल्पपत्र समितीमध्ये आहेत. केंद्रीय रस्ता वहन मंत्री नितीन गडकरींना सामाजिक व स्वयंसेवी संघटना संपर्क समितीमध्ये तर राज्यसभा सांसद विनय सहस्त्रबुद्धेंना साहित्य निर्माण समितीमध्ये घेण्यात आले आहे. त्याशिवाय केंद्रीय मनुष्यबळ विकास प्रकाश जावड़ेकर ह्यांना प्रबुद्ध संमेलन समितीमध्ये घेतले गेले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढ़ा असे एकमेव नेते आहेत ज्यांन दोन समित्यांमध्ये स्थान दिले गेले आहे. लोढ़ा ह्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवास व विमान समिती तसेच लाभार्थी संपर्क समितीमध्ये स्थान मिळाले आहे. ह्या सूचीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे नाव भुवया उंचावणारे आहे. ते भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले सांसद आहेत.
आपल्या निवडणूक अभियान टीममध्ये राणे, गडकरी, गोयल, जावड़ेकर, सहस्त्रबुद्धे आणि लोढ़ा अशांना लोकसभा निवडणुकीचे व्यवस्थापन, प्रचार व संचालनमध्ये दिग्गज असलेल्या नेत्यांना स्थान देऊन भाजपा अध्यक्ष अमित शाह ह्यांनी ह्यावेळी लोकसभा निवडणूक किती भक्कम प्रकारे लढवली जाईल, हेच दर्शवले आहे.