पुणे- जन्मशताब्दी निमित्त यंदा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयन्ती महोत्सव ३ दिवस चालणार असून या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे . आज यासंदर्भात महोत्सवाचे स्वागताध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली .
पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने होणार्या या महोत्सवाचा प्रारंभमंगळवार दिनांक ३० जुलै पासून होतो आहे .सावित्रीमाइ फुले विद्यापीठाचे कुगुरू डॉ .नितीन करमळकर,एम पी एस सी टाॅप्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांती कुमार पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांच्या हस्ते प्रथम दिनी १० वी १२ वी उत्तीर्ण ,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजात विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. ३१ जुलै रोजी अण्णाभाऊंच्या जीवन चरित्रावर आधारित शाहिरी ,पोवाडे,आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार यादव साधू सोनावणे अंकल यांना देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सत्यशोधक मुक्ता साळवे विद्याभूषण पुरस्काराने मोनिका रोहिदास कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.तर लढवय्या फकीरा पुरस्काराने विनोध भगवान वैरागर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.