७ वर्षाच्या चिमुकल्या अवनीत साबळे व अपंग चैतन्य कुलकर्णीची जगावेगळी कामगिरी
पुणे-महाराष्ट्रातील 360 एक्सप्लोरर या आघाडीच्या ट्रेकिंग ग्रुपने १५ ऑगस्ट रोजी एक इतिहास घडवत महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर ६२ फुट लांबीचा तिरंगा फडकावला. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ३२५ ट्रेकर्स ३५० एक्स्प्लोरर च्या मोहिमेत सहभागी झाले असून प्रत्येकाने या आगळ्यावेगळ्या मोहिमेमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केली.
भारताचे सुपुत्र एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे गिर्यारोहक बालाजी जाधव, निखिल यादव, दीपक कोणाळे, अमोघ मोहिते, आशिष निर्वाना क्रॉसफिट जिमचे राहुल व रुपेश सोनकांबळे यांनी 360 एक्सप्लोरर मार्फत आयोजित केलेल्या १५ ऑगस्ट रोजीच्या मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रातील ३२५ जणांनी सहभाग घेतला होता. जवळपास ६२ फुट लांबीचा तिरंगा भर पावसात आणि धुक्याने भरलेल्या आसमंतात फडकावून संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. अगदी नागपूर, जालना पासून सांगली मध्यप्रदेश येथील लोकही या ट्रेकमध्ये एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते. भर पावसात सकाळी ६ वाजता चढाई सुरवात करून १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०.३० च्या सुमारास त्यांनी ध्वज फडकवला.
अवनीत साबळे व चैतन्य कुलकर्णी यांनी घडवला इतिहास-
७ वर्षाच्या अवनीत साबळे याने आपली आई अंजली साबळे सोबत या मोहिमेत सहभागी होवून त्याच्या वयाच्या मुलांपुढे एक आदर्श उभा केला आहे. सर्वांच्या पुढे राहून अवनीतने सर्वाना प्रेरणा दिली. मुळचा अहमदनगर येथील अपंग असलेला चैतन्य कुलकर्णी गेले काही महिने एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गिर्यारोहणाचे धडे घेत आहे. ४ वर्षापूर्वी नारळाच्या झाडावरून पडून अपंग झालेला चैतन्यने कळसुबाई शिखर सर करून अनेकांना चकित केले. 360 एक्सप्लोरर टीममुळेच हे यश मिळवू शकलो अश्या भावना त्याने व्यक्त केल्या.
“एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत या मोहिमेत ट्रेकिंगच्या आनंदासोबतच देशप्रेमाची भावना या जागवली. 360 एक्सप्लोरर या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद त्यांच्यामुळेच महाराष्ट्रातील अनेकांचे स्वप्न पूर्ण होत आहे”
डॉ. अनिल वावले (पुणे)
“ही मोहीम आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.ट्रेकिंगमध्ये मिळणारा आनंद जगाच्या कोणत्याही गोष्ठीतून मिळू शकणार नाही. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व डॉ. सागर गोपाळे याच्यासोबत नंतर अनेक वेळा ट्रेकिंगला जाणार असा निश्यय केला आहे. 360 एक्स्प्लोरर टीममधील सर्व लीडर्समुळेच या आगळ्या मोहिमेत सहभागी होवून यश मिळवता आले.
डॉ. गणेश कुलकर्णी