लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्डसाठी सर्वाना सहभागी होण्याचे आवाहन
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर ग्रुपद्वारे कळसुबाईवर सर्वात लांब तिरंगा नेहून होणार विश्वविक्रम
पुणे- 360 एक्सप्लोरर व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे सोबत भारताच्या स्वातंत्रदिनादिनी एक आगळी वेगळी मोहीम आखली असून कळसुबाई शिखरावर भारताचा सर्वात लांब तिरंगा नेहून महाराष्ट्रातील शेकडो लोक जागतिक विश्वविक्रम करणार आहेत. या तिरंग्याची लांबी ६२ फुट असणार असून आतापर्यंत कळसुबाईवर जाणारा सर्वात लांब तिरंगा ठरणार आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, बुलढाणा पासून संपूर्ण महाराष्ट्रातून यात शेकडो लोक सामील होणार असून हा प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण असणार आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांची “360 एक्स्प्लोरर” च्या या उपक्रमात “ट्रेक डायरीज” ही संस्थाही सहभागी होणार आहे.
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी २०१२ मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करून त्यांनतर अतापर्यंत जगातील ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरे सर केली आहे. एव्हरेस्टनंतर 360 एक्सप्लोरर या संस्थेद्वारे जगभरात अनेक मोहिमा आयोजित करत आहेत. सोलापुरात साहसी खेळांना प्राधान्य मिळावे तसेच अनेक गिर्यारोहक तयार व्हावेत यासाठी 360 एक्स्प्लोरर काम करत राहणार आहे. यासाठी १५ ऑगस्ट रोजी कळसुबाई शिखरावर जावून एका आगळावेगळा इतिहास निर्माण करण्याची संधी सर्वाना उपलब्ध होणार आहे. सोलापूरमधील अनेक उद्योजक, डॉक्टर्स, कॉलेजचे विद्यार्थी, गृहणी या रेकॉर्ड मोहिमेत सहभागी होणार आहेत असे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी सांगितले.
“360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” चे अनावरण-
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी आत्तापर्यत १४ पेक्षा जास्त विक्रम केले आहे. यांच्याच प्रयत्नातून या १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात “360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” या रेकॉर्ड बुकची सुरवात होणार आहे. सर्वाना या बुक मध्ये रेकॉर्ड करता येणार आहे. गेल्या ६ वर्षात आपल्या नावे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अनेक विश्वविक्रम नोंदवल्यानंतर स्वतचे “360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” बुक काढून अनेकांना विक्रमवीर बनवण्याचा आनंद बनसोडे यांचा मानस आहे. १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर या रेकॉर्ड बुकची सुरवात होणार आहे. कोणी काही विक्रम केला असेल तर याची नोंद होण्यासाठी प्रस्ताव पाठवू शकता असे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी सांगितले आहे.
असा आहे कळसुबाई चा प्रवास-
१४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आपआपल्या शहरातून निघून १५ ऑगस्ट रोजी पहाटे अकोले (अहमदनगर) तालुक्यातील “बारी” या कळसुबाई शिखराच्या पायथ्याच्या गावात पोहचायचे आहे. सकाळी ७ वाजता चढाई सुरवात करून १० वाजता सर्वोच्च शिखरावर सर्वात लांब तिरंगा फडकवण्याचा या टीमचा उद्देश आहे. वर जेवण करून परतीचा प्रवास सुरु होणार असून १५ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत आपआपल्या शहरात पोहोचणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी व विश्वविक्रमात स्वतचे नाव नोंदण्यासाठी 7276041985/ 7276641985/ 9067045500/ 9067035500 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.