पालकांच्या सर्मपणाची पाल्यांनी जाण ठेवावीः- रजा मुराद
पुणेः- पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालक दिवस-रात्र झटत असतात. त्यांचे संपूर्ण जीवन पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्मपीत असते, पाल्यांनी पालकांच्या या सर्मपण भावनेची जाण ठेवली पाहिजे असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी व्यक्त केले.
येथील डॉ. संजय चोरडिया यांनी त्यांच्या माता-पित्यांच्या स्मरनार्थ स्थापलेल्या बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्ट आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा आदर्श माता-पिता पुरस्कारयंदा
नवलखा उद्योगसमुहाचे बिर्दीचंदजी आणि शांताबाई नवलखा यांना आज प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद आणि प्रसिद्ध योगाचार्य डॉ. संप्रसाद विनोद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ योगगुरू डॉ. दत्ता कोहिनकर, प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख डॉ. संजय चोरडिया, सुक्ष्मा चोरडीया, कोहिणूर उद्योग समुहाचे कृष्णकुमार गोयल, काॅंग्रेसचे वरिष्ठ नेते अभय छाजेड, बांधकाम व्यवसायीक भारत देसडला आदी मान्यवर उपस्थित
होते.
यावेळी कमलदेवी प्रकाशचंदजी कर्णावट यांना समाज रत्न पुरस्कार, रामलालजी शिंगवी यांना समाजभूषण पुरस्कार, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि रांका ज्वेलर्सचे ओमप्रकाश रांका यांना समाजभूषण पुरस्कार, विलास राठोड यांना मानव सेवा पुरस्कार आणि जैन जागृती मासिकाला उत्कृष्ट मासिकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. तसेच यावेळी दहावी आणि बारावीत 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या आणि पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या सत्कारांचे स्वरूप आहे.
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद त्यांच्या मनोगतात पुढे म्हणाले, मला विद्यार्थी दशेत पाठ्यक्रम अभ्यासात विशेष गती नव्हती. पंरतू जीवनात संधी मिळताच मी आयुष्यात स्वतःला सिद्ध करुन दाखविले. विद्यार्थ्यांनी देखील त्यांना मिळालेल्या संधीचे सोन केले पाहिजे. शिक्षक आणि पालक आपल्या यशोशिखराचा पाया असतात.त्यांनी आपल्यावर केलेल्या संस्कारामुळेच आपण चारित्र्यव्यक्ति म्हणुन समाजात नाव कमवतो. ती संस्कारांची पाळमुळे आपण जपली पाहिजे, आणि त्या पाळमुळांना कुठे धक्का पोहचेल असे वर्तन आपले नको. तसेच आपल्याला मिळालेल्या शिक्षणाच्या संधीतून आपण सक्षम होऊच, पंरतू जे रसत्यावर भटकत आहेत, जे शिक्षणाच्या गंगेपासून वंचित आहेत अशांना देखील आपण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे.
प्रसिद्ध योगाचार्य डॉ. संप्रसाद विनोद त्यांच्या मनोगतात म्हणाले, भारतात कुटुंब आणि गुरु-शिष्य परंपरा आहेत. गुरु त्याच्या शिष्यांवरुन ओळखला जातो. उपदेश करणारे आयुष्यात अनेक भेटतात पंरतू आपल्या शेजारी बसून आपल्या पातळीवर येऊन मार्गदर्शन करणारे केवळ गुरु आणि पालकच असतात. पुर्वी घराघरातून सहज संस्कार केले जायचे पंरतू आज संसस्कारांचे देखील वर्ग लावावे लागतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख डॉ. संजय चोरडिया यांनी केले.