पुणे-राज ठाकरेंच ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळकुटेपणा आणि फसवेपणा आहे. ईव्हीएम बाबातच्या आक्षेपांबाबत सुप्रिम कोर्ट आणि निवडणूक आयोगात लढा देणे गरजेचे आहे. तसे न करता केवळ आंदोलन करणार असाल तर तो पळपुटेपणा ठरेल. ईव्हीएम बाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा बाण सुटला आहे भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत आहे. कशा पद्धतीची भाषा यात वापरली जाते यावर पुढचे अवलंबून आहे. शिवेसेनेकडून बाण सुटला आहे. आता भाजप शिवसेनेच्या बैठकीत शिवसेना काय भूमिका घेते यावर सर्व अवलंबून आहे.
लोकसभेच्या निवडणुकांना काँग्रेसने वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण दिल्याशिवाय पूढील बोलणी करण्यात येणार नाही. पक्षांतराबाबत ते म्हणाले, ब्लॅकमेलिंग चे राजकारण सुरू आहे हे मी मानतो, परंतु राष्ट्रवादीतून जे पक्षांतर सुरू आहे त्यात अनेक नेत्यांच्या चौकश्या सुरू आहेत. त्यामुळे तिहार ऐवजी भाजप चा जेल या नेत्यांनी स्वीकारला आहे.
पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण आहे. काँग्रेसने या आधी तसेच केले होते. आता भाजप कडून तेच चालू आहे. परंतु मी पक्ष फोडणार नाही. तसेच काँग्रेस राष्ट्रवादी मधील कोणाला पक्षात घेणार ही नाही.