लखनऊ – उत्तरप्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेवर सोमवारी सकाळी साडे चार वाजता बस नाल्यात पडली. या दुर्घटनेत 29 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात पहाटे साडे चार वाजता आग्रापासून 9 किमी लांब एत्मादपूरजवळ घडला. मृतांमध्ये 27 पुरुष आणि दोन मुलींचा समावेश आहे.
उत्तरप्रदेश रोडवेजची ‘जनरथ सेवा’ बस लखनऊहून दिल्लीकडे जात होती. बसमध्ये 50 पेक्षा अधिक प्रवासी होते. बस भरधाव वेगात होती आणि चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याची शंका आग्रा एनजी रवी कुमार यांनी व्यक्त केली आहे. क्रेनच्या मदतीने बसला नाल्यातून बाहेर काढले.
5 लाख रुपये मदतीची घोषणा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि परिवहन मंत्री स्वतंत्र देव सिंह यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, या दुर्घटनेतील पीडितांना शक्य तितकी मदत करण्यात येत आहे