पुणे-‘‘आम्हाला काश्मीरात भारतीय म्हणूनच जगायचे आहे आणि भारतीय म्हणूनच मरायचे आहे. ‘भारतमाता की जय अन वंदे मातरम् ’असा जय घोष करीतच आम्ही येथे जगू इच्छितो. आपल्या विश्वशांति महायागामुळे आमची आम्ही भारतीय ही श्रध्दा भक्कम होते. यामुळे असेच विश्वशांती यागाचे राष्ट्रएैक्यासाठीचे उपक्रम जम्मू भागातील १० आणि काश्मीर राज्यातील १० जिल्ह्यातून संपन्न व्हावेत असे मानस जम्मू काश्मीर राज्यातील सामान्य जनतेकडून ऐकायला मिळाले. महाराष्ट्राने काश्मीरी जनतेची पाठराखन भक्कम केली पाहिजे.’’असे एमआयटी विश्वशांती विश्वविद्यालयाचे गुरूकुलाचे आचार्य शारदा ज्ञानपीठ संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ यांनी एका आठवडाच्या जम्मू काश्मीर दौऱ्यानंतर येथे सांगितले.
मनतलाई ( उधमपूर) येथे काश्मीरच्या सर्वज्ञपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री अमृतेश्वरानंदन देवतीर्थ महाराज यांच्या चतुर्मास्य समाप्तीचा सोहळा पं. गाडगीळ यांच्या ९० व्या वर्धापन निमित्ताने विशेष बहुमानाने १४ सप्टेंबर २०१९ भाद्रपद पौर्णिमेला संपन्न झाला. काठमांडूहून नेपाळी पंडित, आंध्र, तामिळनाडूचे दक्षिणी वैदिक आणि महाराष्ट्रातून निमंत्रिलेले एमआयटी विश्वविद्यालयाचे पं. गाडगीळ यांच्या सहभागाने विश्वशांतीयाग संपन्न झाला. चैत्रेच्या रामानुजमिशन ट्रस्ट तर्फे विश्वशांती महायागाच्या काश्मीर राज्यभर २० ठिकाणी संकल्पित कार्यक्रमासाठी पं. गाडगीळ यांच्या हस्ते एकलक्ष आठ हजार रूपयांचा निधी जगद्गुरूचरणी अर्पण करण्यात आला. जगद्गुरू शंकराचार्य सर्वज्ञपीठ आणि चैत्रेव रामानुजमिशन ट्रस्टने पं. गाडगीळ यांना नव्वदी निमित्त बहुमान केला.
आपण आपले नव्वदीवे पूर्ण वर्ष महराष्ट्र आणि जम्मू काश्मीर या राज्यांचे स्नेहबंध सुदृढ व्हावेत म्हणून संपूर्ण काश्मीर संचार करणार आहे. पं. गाडगीळ यांनी सांगितले.